शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 4, 2024 17:10 IST

दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते.

शीतलकुमार कांबळे, सोलापूर : दिवसेंदिवस सोलापूरचेतापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते. या वाढत्या उन्हाचा विचार करुन वाहतूक शाखेकडून दुपारी १२ ते ५ दरम्यान शहरातील सिग्नल बंद करण्यात येत आहेत. यासाठी अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

शहरात विविध ठिकाणी एकूण २० सिग्नल आहेत. यातील काही स्वयंचलित आहेत. वाहनचालक शहरातून जात असताना सिग्नल लागल्यास त्याला उन सहन करत थांबावे लागते. काही वाहन चालक तर उन्हापासून वाचण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत. त्यातच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटाचा इशारा दिला आहे. सिग्नलवर उन्हात उशीरा थांबल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दुपारी सिग्नल बंद करतात. या वर्षी एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

अवजड वाहनांची वाहतूक असणारे चौक म्हणजजेच शांती चौक, जुना बोरामणी नाका, अक्कलकोट नाका, आसरा चौक या ठिकाणी सिग्नल वाहतुकीची परिस्थिती पाहून सुरु किंवा बंद करण्यात येणार आहेत. उन वाढल्यामुळे उष्णतेचे विकार होऊ नये, उन्हात नागरिकांना सिग्नलवर तिष्टत थांबावे लागू नये यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार दुपारी १२ ते ५ दरम्यान सिग्नल बंद राहणार आहे, असे पोलिस निरिक्षक धनाजी शिंगाडे, तानाजी दराडे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानtraffic policeवाहतूक पोलीस