शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

ही देवेंद्र फडणवीसांची मोडस ऑपरेंडी; प्रणिती शिंदेंनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 16:33 IST

काँग्रेस स्थिर आहे, आम्ही कुठेच जात नाही आहोत आणि येणाऱ्या काळात खंबीरपणे महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देणार आहोत. - प्रणिती शिंदे

महाराष्ट्रामध्ये एक अतिशय अस्थिर सरकार व्यवस्थितपणे देण्यात भाजप, देवेंद्र फडणवीस, मोदी आणि अमित शहांच्या आशीर्वादामुळे यशस्वी झाले आहे. काँग्रेस स्थिर आहे, आम्ही कुठेच जात नाही आहोत आणि येणाऱ्या काळात खंबीरपणे महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देणार आहोत. काँग्रेस पक्षाने खूप सत्तेचे दिवस बघितलेले आहेत आणि आम्ही लालची नाही आहोत, परंतू मोदींमध्ये लालचीपणाची भावना दिसून येत आहे. खोटं बोलण्याची ही वृत्ती आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. 

मोदी अमेरिकेला गेले आणि म्हणाले,"हमारे देश में लोकशाही कायम है, और हमारे यहा जातिवाद होता नही है". मणिपूर तिकडे जळत आहे, ठिकठिकाणी दंगली पेटवायचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे मला सोलापूरकरांच अभिनंदन करावसे वाटतेय. भाजपने इकडे फ्रंट म्हणून दुसऱ्याला ठेऊन षडयंत्र रचलेले. 2024 इलेक्शन येत आहे सावध रहा, ते आपल्या रक्तावरपण राजकारण करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात तो प्रयत्न चालू आहे.  औरंगाबादमध्ये तो चालू होता, सोलापूरमध्ये चालू आहे. मात्र, सोलापूरकर या गोष्टींना बळी पडले नाहीत त्यामुळं त्यांचं मनापासून स्वागत करायचं आहे. सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही जिवंत आहे. मोदींच्या या गलिच्छ राजकारणाला बळी पडू नका. भाजपची ही जी कीड देशाला लागलेली आहे ती कायमस्वरूपी नष्ट करूयात, असे शिंदे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांची ही मोडस ऑपरेंडी आहे, ईडीच्या माध्यमातून कारवाई करा आणि मग त्यांना आपल्या पक्षात आपली बाजू वाढवण्यासाठी घ्या. मोदीच्या विरोधात बोलतो याचा मला अभिमान आहे. कारण आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही जनतेसाठी काम करतो. आम्ही काय केलेय एवढे की त्यामुळे इडी आमच्या मागे लागेल. काँग्रेस फोडण्याचा ते प्रयत्न करतील पण काँग्रेस फुटणार नाही उलट आमच्याकडे इनकमिंगच होत आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे, त्यांच्याकडे सक्षम लोक नसतील त्यामुळं ते काँग्रेस मधील सक्षम लोकांना पोर्च करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला. 

वारंवार कोर्टामध्ये दबाव वापरून राहुल गांधींच्या स्टे साठी कोर्टामध्ये केलेले अपील खारीज करण्यात आलेले आहे. मोदींकडून आणि भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारचे दबावतंत्र आमच्यावर आणि आमच्या नेत्यांवर वापरले जातात. इडीच्या भीतीमुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आलेत, पण एक स्थिर सरकार महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही. राहुल गांधींच्या विरोधात एवढं मोठं षडयंत्र चालू आहे मात्र, याचा  राहुल गांधींना काहीही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये जेव्हा पत्रकार पण आंदोलनामध्ये सहभागी होतात, तेव्हा खरंच डोळे उघडले जातात आणि लोकशाहीचं खच्चीकरण दिसून येतं. राहुल गांधींच्या तेलंगणाच्या सभेत पाच लाखापेक्षा जास्त लोक जमली होती,तेलंगणा मध्ये आता काँग्रेसचे सरकार येणार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी