शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ही देवेंद्र फडणवीसांची मोडस ऑपरेंडी; प्रणिती शिंदेंनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 16:33 IST

काँग्रेस स्थिर आहे, आम्ही कुठेच जात नाही आहोत आणि येणाऱ्या काळात खंबीरपणे महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देणार आहोत. - प्रणिती शिंदे

महाराष्ट्रामध्ये एक अतिशय अस्थिर सरकार व्यवस्थितपणे देण्यात भाजप, देवेंद्र फडणवीस, मोदी आणि अमित शहांच्या आशीर्वादामुळे यशस्वी झाले आहे. काँग्रेस स्थिर आहे, आम्ही कुठेच जात नाही आहोत आणि येणाऱ्या काळात खंबीरपणे महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देणार आहोत. काँग्रेस पक्षाने खूप सत्तेचे दिवस बघितलेले आहेत आणि आम्ही लालची नाही आहोत, परंतू मोदींमध्ये लालचीपणाची भावना दिसून येत आहे. खोटं बोलण्याची ही वृत्ती आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. 

मोदी अमेरिकेला गेले आणि म्हणाले,"हमारे देश में लोकशाही कायम है, और हमारे यहा जातिवाद होता नही है". मणिपूर तिकडे जळत आहे, ठिकठिकाणी दंगली पेटवायचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे मला सोलापूरकरांच अभिनंदन करावसे वाटतेय. भाजपने इकडे फ्रंट म्हणून दुसऱ्याला ठेऊन षडयंत्र रचलेले. 2024 इलेक्शन येत आहे सावध रहा, ते आपल्या रक्तावरपण राजकारण करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात तो प्रयत्न चालू आहे.  औरंगाबादमध्ये तो चालू होता, सोलापूरमध्ये चालू आहे. मात्र, सोलापूरकर या गोष्टींना बळी पडले नाहीत त्यामुळं त्यांचं मनापासून स्वागत करायचं आहे. सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही जिवंत आहे. मोदींच्या या गलिच्छ राजकारणाला बळी पडू नका. भाजपची ही जी कीड देशाला लागलेली आहे ती कायमस्वरूपी नष्ट करूयात, असे शिंदे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांची ही मोडस ऑपरेंडी आहे, ईडीच्या माध्यमातून कारवाई करा आणि मग त्यांना आपल्या पक्षात आपली बाजू वाढवण्यासाठी घ्या. मोदीच्या विरोधात बोलतो याचा मला अभिमान आहे. कारण आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही जनतेसाठी काम करतो. आम्ही काय केलेय एवढे की त्यामुळे इडी आमच्या मागे लागेल. काँग्रेस फोडण्याचा ते प्रयत्न करतील पण काँग्रेस फुटणार नाही उलट आमच्याकडे इनकमिंगच होत आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे, त्यांच्याकडे सक्षम लोक नसतील त्यामुळं ते काँग्रेस मधील सक्षम लोकांना पोर्च करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला. 

वारंवार कोर्टामध्ये दबाव वापरून राहुल गांधींच्या स्टे साठी कोर्टामध्ये केलेले अपील खारीज करण्यात आलेले आहे. मोदींकडून आणि भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारचे दबावतंत्र आमच्यावर आणि आमच्या नेत्यांवर वापरले जातात. इडीच्या भीतीमुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आलेत, पण एक स्थिर सरकार महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही. राहुल गांधींच्या विरोधात एवढं मोठं षडयंत्र चालू आहे मात्र, याचा  राहुल गांधींना काहीही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये जेव्हा पत्रकार पण आंदोलनामध्ये सहभागी होतात, तेव्हा खरंच डोळे उघडले जातात आणि लोकशाहीचं खच्चीकरण दिसून येतं. राहुल गांधींच्या तेलंगणाच्या सभेत पाच लाखापेक्षा जास्त लोक जमली होती,तेलंगणा मध्ये आता काँग्रेसचे सरकार येणार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी