शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सात साखर कारखान्यांची मालमत्ता जप्तीचे आदेश; पुढील कारवाई तहसीलदारांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:28 IST

आता तहसीलदार साखर व इतर मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील

सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केलेल्या जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार हे तहसीलदारांच्या कारवाईवर अवलंबून आहे.

यावर्षी हंगामासाठी गाळपाला आणलेल्या उसाचे पैसे कारखानदारांनी थकवले आहेत. विठ्ठलराव शिंदे करकंब, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, विठ्ठल काॅर्पोरेशन म्हैसगाव व पांडुरंग श्रीपूर हे साखर कारखाने सोडले तर सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. मात्र, यापैकी सात साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १० मार्च रोजी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व प्रादेशिक साखर सहसंचालक सोलापूर कार्यालयाला १० मार्च रोजी पुढील कारवाई करण्याबाबत कळविले आहे.

त्यानुसार साखर व इतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना दिले आहेत.  आता तहसीलदार साखर व इतर मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.

  • 0 श्री. विठ्ठल गुरसाळे- ३९ कोटी ७६ लाख रुपये.
  • 0 गोकुळ माऊली शुगर -२१ कोटी ६ लाख रुपये
  • 0 सिद्धनाथ शुगर तिर्हे- ७२ कोटी ९६ लाख रुपये.
  • 0 विठ्ठल रिफायनरी- ६० कोटी ६१ लाख रुपये.
  • 0 जय हिंद शुगर-६१ कोटी ८१ लाख रुपये.
  • 0 लोकमंगल शुगर बीबीदारफळ ३१ कोटी ३९ लाख रुपये.
  • 0 लोकमंगल शुगर इथेनाॅल भंडारकवठे- ७७ कोटी ६८ लाख रुपये.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी