शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सोलापुरात नळाला आलेल्या गढूळ पाण्याची तक्रार पोहोचली ‘पीएमओ’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:14 IST

पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांपर्यंत ही तक्रार पोहोचल्यानंतर त्यांनी झोन कार्यालयाला कळवून गढूळ  पाण्याचे कारण शोधण्याचे आदेश दिले. 

ठळक मुद्देसहा दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिक हैराण झालेतीन एप्रिलनंतर शहरात तीन दिवसाआड पाणी येईल, असे महापालिका सांगत आहे.

सोलापूर : ऐन उन्हाच्या कडाक्यात शहरात सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून विजापूर रोडवरील निर्मिती गणेश भागात गढूळ पाणी येत असल्याची तक्रार येथील नागरिकाने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. ही कसली स्मार्ट सिटी असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. 

सहा दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. तीन एप्रिलनंतर शहरात तीन दिवसाआड पाणी येईल, असे महापालिका सांगत आहे. विजापूर रोडवरील निर्मिती गणेश सोसायटीतील रहिवासी अमेय केत यांनी रविवारी पंतप्रधान कार्यालयाला एक टिष्ट्वट केले. 

सहा दिवसानंतर बेटाईम रात्री सव्वाबाराला घाण पाणी येत आहे. ही असली कसली स्मार्ट सिटीसोलापूर? धरणात पाणी कमी आहे मान्य, पण पाणी तर देऊ नका. प्राथमिक गरजा पण नीट पूर्ण होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. या टिष्ट्वटसोबत त्यांनी घाण पाण्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. सोशल मीडियावर हे टिष्ट्वट व्हायरल झाले. 

स्मार्ट सिटीच्या कामावर पुन्हा टीका होऊ लागली. पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांपर्यंत ही तक्रार पोहोचल्यानंतर त्यांनी झोन कार्यालयाला कळवून गढूळ  पाण्याचे कारण शोधण्याचे आदेश दिले. 

संबंधित भागात काही दिवसांपूर्वी पाईपलाईनचे, व्हॉल्व्हचे काम झाले होते. या कामात काही तांत्रिक त्रुटी राहिल्या असाव्यात. विभागीय कार्यालयातील अधिकाºयांना याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी अहवाल येईल. - व्यंकटेश चौबेउपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी आम्ही काटकसरीने पाणी वापरण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण गढूळ पाणीपुरवठा होणे हे नागरिकांच्या आरोग्याला बाधा आणणारे आहे. पाणीपुरवठा विभागाने वेळीच दखल घेणे गरजेचे होते. त्यांनी दखल न घेतल्याने पंतप्रधान कार्यालयाला टिष्ट्वट करावे लागले.- अमेय केतरहिवासी, निर्मिती गणेश, विजापूर रोड

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईSmart Cityस्मार्ट सिटीNarendra Modiनरेंद्र मोदी