शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

दिलासादायक; रूग्णांच्या आजारावर डॉक्टरांचे फोनवरून औषधयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 14:00 IST

लॉकडाऊनचा परिणाम: सर्दी, डोकेदुखीवरील उपचारासाठी सर्वाधिक कॉल्स

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून फोनव्दारे रुग्णांना सल्ला देण्यात येत आहेरुग्णांची सोयही होत आहे.यासाठी निमा संघटनेच्या २२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली फोनव्दारे रुग्णांना सल्ले देतात. प्रत्येक डॉक्टरांना दिवसाकाठी जवळपास वीस फोन येत असतात

सोलापूर : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घराच्या बाहेर निघणे हे खूप धोकादायक ठरत आहे. यामुळे शासनाच्या वतीने घराच्या बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात येत आहे; पण यामुळे ज्यांना आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत. अशा रुग्णांना मात्र अडचणीचे ठरत आहे.  सर्दी, डोकेदुखी, पोटदुखी अशा आजारांच्या रुग्णांसाठी डॉक्टरांच्या वतीने फोनवरून मोफत सल्ला देण्यात येत आहे.  दिवसाकाठी शेकडो रुग्णांना फोनमधून सल्ला देण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  यामुळे काही वेळेपुरतेच दवाखाने उघडे असतात; पण यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या वतीने फोनवरून रुग्णांना सल्ला दिला जात आहे. काहीवेळा डॉक्टर हे रुग्णांना औषधे हे मेसेजव्दारे पाठवतात तर काही वेळेस त्यांना मेडिकलमधून फोन करण्यास सांगून औषधे दिली जातात. सल्ला देताना रुग्ण आपल्या ओळखीचा आहे का त्यानुसार त्यावर उपचार केले जातात. यावेळी काही साधारण आजाराचे लक्षण असणाºयांनाच फोनमधून औषधांचा सल्ला दिला जातो.

सर्वांना मोफत सल्ला- सध्या दिवसाकाठी एका डॉक्टरांना पंधरा ते वीस फोन येत असतात. त्या सर्वांना मोफत सल्ला दिला जातो. दररोज साधारणत: सर्दी, पोटदुखी, डोकेदुखी अशा आजारांचे डॉक्टरांना फोन येत आहेत. अशा रुग्णांना डॉक्टर हे फोनमधूनच सल्ला देतात व ज्या रुग्णांना प्रत्यक्षात पाहणे गरजेचे असते त्या रुग्णांना मात्र त्यांच्या घराजवळील क्लिनिकमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला जातो.

गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून फोनव्दारे रुग्णांना सल्ला देण्यात येत आहे. यामुळे रुग्णांची सोयही होत आहे.यासाठी निमा संघटनेच्या २२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते फोनव्दारे रुग्णांना सल्ले देतात. प्रत्येक डॉक्टरांना दिवसाकाठी जवळपास वीस फोन येत असतात. त्या सर्वांना मेसेजव्दारे औषधे दिली जातात.- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, राष्ट्रीय अध्यक्ष निमा

माझे क्लिनिक हे दररोज उघडत असतो; पण  यानंतरही रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना फोनवरून सल्ला दिला जातो, यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी आहे. याचा खूप मोठा फायदा आहे. यामुळे रुग्णांचा  त्रासही लवकर बरा होण्यास मदत होत आहे.- डॉ. रुपेश येडके

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय