शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सोलापुरातील हवामानात होतेय बदल; रात्री थंडी, पहाटे पाऊस अन् दिवसभरही गारवा !

By appasaheb.patil | Updated: December 4, 2019 11:56 IST

हवामानातील बदल : सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले, काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

ठळक मुद्देमागील दहा ते पंधरा दिवसांपासून सोलापूर शहरात चिकुनगुन्याच्या रूग्ण संख्येत वाढऐन थंडीच्या मोसमात अचानक पाऊस पडत असल्याने लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंतच्या लोकांचे आरोग्य बिघडत चाललेसोलापूर शहरासह ग्रामीण भागातील सर्वच रुग्णालये सध्या हाऊसफुल्ल

सोलापूर : पहाटे रिमझिम पाऊस, दिवसभर हवेत गारवा, सायंकाळी थंडी अशी रूतुमाने सोलापूरकरांना पाहावयास मिळत आहेत़ या बदलत्या वातावरणाचा प्रभाव लहान मुलांवर सर्वाधिक पडू लागला आहे़  हवामान बदलामुळे लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, चिकुनगुन्या, डेंग्यू, निमोनिया, अस्थमा, कफ आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे़ या बदलत्या हवामानात पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या पाल्याच्या तब्येतीची वेळेत काळजी घ्यावी व आपल्या पाल्यांना सुदृढ, निरोगी ठेवावे, असे आवाहन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ़ अतुल कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले आहे़ 

पावसाळा आणि आॅक्टोबर हीटनंतर आता हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असतानाच सोलापुरात मागील दोन ते तीन दिवसांपासून पडणाºया रिमझिम पावसामुळे सोलापुरातील हवामानात बदल झाला आहे़ या बदलत्या हवामानामुळे लहान मुले आजारी पडत आहेत.

ऐन थंडीच्या मोसमात अचानक पाऊस पडत असल्याने लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंतच्या लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहे़ त्यामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील सर्वच रुग्णालये सध्या हाऊसफुल्ल दिसून येत आहेत.

हिवाळा म्हणजे शरीर तंदुरूस्त राहण्याचा महिना मानला जातो़ या महिन्यात शरीरात अनेक बदल होत असतात. प्रामुख्याने लहान मुलांची विशेष काळजी पालकांनी घ्यायला हवी़ ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसताच त्वरित डॉक्टरांना दाखवा़ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत़ बदलत्या हवामानात पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आपल्या परिसरातील दूषित पाणीसाठे नष्ट करा, थंडी व पावसापासून लहान मुलांचा बचाव करा, असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे़ 

चिकुनगुन्या रूग्णांच्या संख्येत होतेय वाढ- मागील दहा ते पंधरा दिवसांपासून सोलापूर शहरात चिकुनगुन्याच्या रूग्ण संख्येत वाढ होताना पहावयास मिळत आहे़ ताप येणे, अंगावर पुरळ येणे, अंग दुखणे आदी लक्षणे असलेले रूग्ण वाढत आहेत़ वेळीच दखल घेऊन संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत़ चिकुनगुन्या हा तीन ते चार दिवसात बरा होणारा आजार आहे. त्यामुळे रूग्णांनी भीती बाळगू नये, असेही आवाहन डॉ़ अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

अशी घ्या काळजी...

  • - बदलत्या हवामानानुसार लहान मुलांच्या खाण्या-पिण्यातही बदल करा. मुलांना उकळून गार केलेले पाणी पिण्यास द्या
  • -  हिवाळ्यात मुले पाणी पिण्याचे नखरे करतात. शरीरास योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलांना दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजले पाहिजे.
  • - मुलांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. 
  • - हिवाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना ऊब मिळेल असे कपडे घाला. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं शक्यतो घ्या.

हिवाळ्याची चाहूल लागताच लहान मुलांच्या खाण्या-पिण्यापासून तर त्यांच्या कपड्यापर्यंत बदल होत असतो़ मुलांना आंबट व थंडगार पदार्थ खाण्यास देऊ नये. हिवाळा म्हणजे तब्येत कमावण्याचा ऋतू आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दररोजच्या आहारात सुकामेवा, फळ, दूध आदींचा समावेश करावा. लहान मुलांना कोमट पाण्याने अंघोळ घालून, कपडे परिधान करुन पुन्हा उन्हात बसवावे. त्याने 'ड' जीवनसत्व मिळते़- डॉ़. अतुल कुलकर्णी,बालरोग तज्ज्ञ.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयchildren's dayबालदिन