शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बार्शीत तूर हमीभाव खरेदी केंद्र बंद, शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:31 IST

बार्शी शहरतील सर्वच गोदामे झाले पॅक, तूर ठेवायला जागा नाही; १२५० शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यात नाफेडच्या मदतीने हमीभाव खरेदी केंद्रे सुरुबार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

शहाजी फुरडे-पाटीलबार्शी : गोदाम पॅक झाल्याने येथील शासकीय तूर खरेदी केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने १२५० शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तूर हमीभाव केंद्रात आतापर्यंत २४० शेतकºयांची २५२९ क्ंिवटल तूर खरेदी केल्यानंतर आता यापुढील तूर ठेवण्यासाठी गोदामात जागाच नाही. 

 केंद्र व राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यात नाफेडच्या मदतीने हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली़ मात्र ती खरेदी केंद्रेदेखील बहुतांश शेतकºयांनी बाजारात कमी भावाने तूर विक्री केल्यानंतर सुरु केली आहेत़ बार्शीत १२ फेब्रुवारी २०१८ रोजी तूर हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले. हे केंद्र केवळ १५ दिवसच सुरु राहिले. या केंद्रासाठी सुमारे १५०० शेतकºयांनी आॅनलाईन पद्धतीने खरेदीची नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी ३३५ शेतकºयांना तूर विक्रीसाठी आणण्याचा मेसेज पाठविण्यात आला. त्यापैकी २४० शेतकºयांची ५ हजार ५८ कट्टे तूर खरेदी झाली. आता गोदामात जागा नसल्याची अडचण पुढे येत आहे. 

त्यामुळे खरेदी केलेली तूर कुठे ठेवायची, हा प्रश्न केंद्रास पडला आहे. बाजार समितीच्या वतीने तहसीलदार व वखार महामंडळाकडे याबाबत लेखी मागणी करुन गोडावून उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे़ तरीदेखील गोडावून उपलब्ध करुन दिलेले नाही़ ही तूर सोलापूर किंवा इतरत्र बाहेर घेऊन जाणे हे वाहतुकीच्या दृष्टीने परवडत नाही़ 

अद्याप शेतकºयांनाही पेमेंट नाही खरेदी केंद्रावर खरेदी केलेला माल वेअरहाऊसला जाऊन त्यांनी नाफेडला कळविल्याशिवाय शेतकºयांना पेमेंटदेखील काढता येत नाही़ खरेदी केलेला माल तसाच पडून असल्यामुळे अद्याप एकाही शेतकºयाला पैसे दिलेले नाहीत़ एकीकडे शासन खरेदीचा वेग वाढवा असे म्हणत आहे तर दुसरीकडे माल ठेवण्यासाठी गोडावूनची उपलब्धता करुन दिली जात नाही़ प्रशासकासह राजकीय नेत्यांचे लक्ष नाही - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती आहे़ प्रशासक असलेले बालाजी कटकधोंड हे आठवड्यातून एक-दोनदा तेही सायंकाळच्या दरम्यान बाजारात येतात. त्यामुळे त्यांचेही बाजारात काय सुरु आहे, याकडे अजिबात लक्ष नाही़ तसेच बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या कोणत्याच पक्षाच्या नेत्यालादेखील खरेदी केंद्रावर काय सुरु आहे याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही़ 

संथगतीने काम सुरु- बार्शीच्या केंद्रावर दोन चाळणी यंत्रे आहेत़ याचा विचार केला तर साधारणपणे दररोज एक हजार क्विंटल तूर खरेदी होणे अपेक्षित आहे़ केंद्रावर संथगतीने काम सुरु असून, असेच काम राहिले तर नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करायला चार महिन्यांचा कालावधी लागेल आणि इतके दिवस शासन खरेदी केंद्र सुरु करणार आहे का? हा मोठा प्रश्न आहे़

पणन मंत्र्यांनी लक्ष घालावे - राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख हेदेखील याच जिल्ह्यातील आहेत. आता त्यांनीच या प्रकरणी लक्ष घालून वेगाने तूर खरेदी होण्यासाठी बार्शीच्या केंद्रावर खरेदी होत असलेली तूर ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन देण्याकामी लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत़ 

खरेदी केंद्रावरील तूर ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन द्यावे अशा मागणीचे पत्र आम्ही एक महिन्यापूर्वी तहसील कार्यालयाकडे दिले आहे़ तसेच जिल्हा पुरवठा अधिकाºयांशीदेखील बोलणे झाले आहे़ आम्ही आमच्या गोदामातील धान्याची वारफेर करुन आणखी दोन हजार कट्ट्यासाठी जागा तयार केली आहे़ -सुहास घोडके, साठा अधीक्षक वखार महामंडळ, बार्शी 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSubhash Deshmukhसुभाष देशमुखAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarket Yardमार्केट यार्ड