शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

लेकरं घरात राहिली, संकट टळलं; कोरोनाच्या भितीनं मुलं संसर्गापासून दूर राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:35 IST

चांगली बातमी; सोलापूर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण घटले

राजकुमार सारोळे

सोलापूर : कोरोना साथीच्या काळात जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात  घट झाल्याचे  दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सन २०२०  मध्ये २३७ ने बालमृत्यूमध्ये घट झाली आहे.    जन्मत: ते १४ वर्षांपर्यंतच्या बालकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जन्मल्यानंतर ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना वेळेत लसीकरण करणे गरजेचे आहे. 

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर, कावीळ, डायरिया, अतिसार, मेंदूदाह, न्यूमोनिया, मलेरिया, डेंग्यू या आजारांना सामना करावा लागतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. बालकांच्या लसीकरणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून अशा बालकांचे सर्वेक्षण करून लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पार पडला जातो. तरीही बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त       आहे. साथीच्या आजारापेक्षा जन्मत: व्यंग असलेली बालके याला बळी पडतात. त्यानंतर गोवर, कावीळ, न्यूमोनियामुळे मुले दगावतात, पण मार्च २०२० नंतर कोरोना साथीच्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला व शाळा सुरू नसल्याने साथीच्या आजाराचे प्रसारण थांबले. मुले घराबाहेर पडली नाहीत तसेच मास्कच्या वापरामुळे आजारी पडण्याचे प्रमाण घटले. यामुळे या काळात बालमृत्यूचे प्रमाणही बरेच खाली आल्याचे आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून  दिसून येत आहे. 

न्यूमोनियाचा प्रभावन्यूमोनिया, कावीळ, गोवर यामुळे मुले दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबराेबर जन्मत: व्यंग, कमी वजन, कमी दिवस, ॲशफॅक्सिया,मेंदूदाह यामुळे बालमृत्यू होतात. न्यूमोनिया व गोवर हे संसर्गजन्य आजार आहेत.

मुले घरातच राहिल्याने संसर्ग टळलाकाेरोना साथीमुळे मुलांना घरातच राहावे लागले. बाहेर पडताना मास्कचा वापर केल्याने संसर्ग झाला नाही. याशिवाय शाळाच नसल्याने मुले संसर्गापासून दूर राहिली. मास्कच्या वापराने सर्दी, खोकला असे आजार झाले नाहीत. 

मास्कचा वापर व मुले घराबाहेर न पडण्यामुळे संसर्ग टळला. अंगणवाडी, शाळा बंद असल्याने मुले एकत्र आली नाहीत हा महत्त्वाचा फॅक्टर ठरला. न्यूमोनिया, गोवर हा अतिसांसर्गिक आहे. मुले घरातच राहिल्याने हा फायदा झाल्याचे दिसत आहे.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी.

संसर्ग, डायरिया, न्यूमोनिया या तीन प्रमुख कारणांमुळे बालके मृत्युमुखी पडतात. कोरोनामुळे लहान मुलांसह मोठ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे संसर्गामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. कावीळ, डेंग्यूचे प्रमाण कमी झाले आहे. - डॉ. अतुल कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलchildren's dayबालदिनHealthआरोग्य