शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
3
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
4
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
5
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
6
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
7
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
8
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
9
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
10
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
11
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
12
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
15
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
16
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
17
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
18
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
19
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
20
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ

लेकरं घरात राहिली, संकट टळलं; कोरोनाच्या भितीनं मुलं संसर्गापासून दूर राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:35 IST

चांगली बातमी; सोलापूर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण घटले

राजकुमार सारोळे

सोलापूर : कोरोना साथीच्या काळात जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात  घट झाल्याचे  दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सन २०२०  मध्ये २३७ ने बालमृत्यूमध्ये घट झाली आहे.    जन्मत: ते १४ वर्षांपर्यंतच्या बालकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जन्मल्यानंतर ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना वेळेत लसीकरण करणे गरजेचे आहे. 

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर, कावीळ, डायरिया, अतिसार, मेंदूदाह, न्यूमोनिया, मलेरिया, डेंग्यू या आजारांना सामना करावा लागतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. बालकांच्या लसीकरणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून अशा बालकांचे सर्वेक्षण करून लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पार पडला जातो. तरीही बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त       आहे. साथीच्या आजारापेक्षा जन्मत: व्यंग असलेली बालके याला बळी पडतात. त्यानंतर गोवर, कावीळ, न्यूमोनियामुळे मुले दगावतात, पण मार्च २०२० नंतर कोरोना साथीच्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला व शाळा सुरू नसल्याने साथीच्या आजाराचे प्रसारण थांबले. मुले घराबाहेर पडली नाहीत तसेच मास्कच्या वापरामुळे आजारी पडण्याचे प्रमाण घटले. यामुळे या काळात बालमृत्यूचे प्रमाणही बरेच खाली आल्याचे आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून  दिसून येत आहे. 

न्यूमोनियाचा प्रभावन्यूमोनिया, कावीळ, गोवर यामुळे मुले दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबराेबर जन्मत: व्यंग, कमी वजन, कमी दिवस, ॲशफॅक्सिया,मेंदूदाह यामुळे बालमृत्यू होतात. न्यूमोनिया व गोवर हे संसर्गजन्य आजार आहेत.

मुले घरातच राहिल्याने संसर्ग टळलाकाेरोना साथीमुळे मुलांना घरातच राहावे लागले. बाहेर पडताना मास्कचा वापर केल्याने संसर्ग झाला नाही. याशिवाय शाळाच नसल्याने मुले संसर्गापासून दूर राहिली. मास्कच्या वापराने सर्दी, खोकला असे आजार झाले नाहीत. 

मास्कचा वापर व मुले घराबाहेर न पडण्यामुळे संसर्ग टळला. अंगणवाडी, शाळा बंद असल्याने मुले एकत्र आली नाहीत हा महत्त्वाचा फॅक्टर ठरला. न्यूमोनिया, गोवर हा अतिसांसर्गिक आहे. मुले घरातच राहिल्याने हा फायदा झाल्याचे दिसत आहे.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी.

संसर्ग, डायरिया, न्यूमोनिया या तीन प्रमुख कारणांमुळे बालके मृत्युमुखी पडतात. कोरोनामुळे लहान मुलांसह मोठ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे संसर्गामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. कावीळ, डेंग्यूचे प्रमाण कमी झाले आहे. - डॉ. अतुल कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलchildren's dayबालदिनHealthआरोग्य