शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

Marathi Language Day; केंद्राची दुटप्पी भूमिका, वेळकाढूपणामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही

By appasaheb.patil | Updated: February 27, 2019 10:39 IST

आप्पासाहेब पाटील सोलापूर : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे जवळपास सर्व प्रयत्न महाराष्ट्र ...

ठळक मुद्देसरकारच्या कारभारावर साहित्य वर्तुळातून नाराजीचा सूर सर्व गोष्टींची पूर्तता करूनही मराठीला अभिजात दर्जा का नाही ?अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरुप मिळण्याची वेळ आली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे जवळपास सर्व प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण झालेत....आता बाकी आहे ती फक्त केंद्र सरकारकडून घोषणेची...अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरुप मिळण्याची वेळ आली आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीने पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केलाय. आतापर्यंत केंद्राने तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा दर्जा दिलाय. पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नेमका कोणत्या कारणासाठी राहिलेला आहे हे मात्र समजायला अवघड आहे़ शासनाची दुटप्पी भूमिका, केंद्राकडे पाठविलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष व पाठपुरावा या कारणामुळे अभिजात दर्जा अद्याप मिळालेला नसल्याने साहित्यिकांनी केंद्र सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

राजकीय अजेंडा समोर ठेवून शासनकर्ते आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने प्रक्रिया सुरू करतात; मात्र मराठी भाषा धोरणाबद्दल, त्याला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत उदासीनता दाखवित आहेत.त्याबद्दल एक शब्दही उच्चारायला तयार होत नाही. याचे कारण शासनाला भाषा धोरण जाहीरच करायचे नाही. मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे दाखविण्यासाठी शासन मराठी भाषा दिनी असंख्य उपक्रम हाती घेते; मात्र गेल्या दीड वर्षापासून कागदावरच राहिलेल्या भाषा धोरणाच्या अंमलबजावणीकडे डोळेझाक करते. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाºया शासनाच्या कारभारावर साहित्य वर्तुळातून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत बोलताना ज्येष्ठ साहित्यिक गो़मा़ पवार म्हणाले की, शासनाने अभिजात दर्जा देण्यासाठी लावलेले निकष योग्य नाहीत़ भाषेचा वापर, परंपरा, दर्जा दिल्यानंतर होणारा परिणाम आदी गोष्टींचा विचार करण्यापेक्षा वेगळ्याच प्रकारचे निकष लावण्यात येत आहेत़ 

मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळत नाही हे सागणं कठीण आहे़ अभिजात दर्जा देणं अवघड नाही़ दर्जासाठी लागणाºया सर्व अटींची पूर्तता केली़ अहवाल दिला, साहित्यिकांची कमिटी केली, ठराव केले, सह्यांची मोहीम घेतली तरीही शासनाकडून मराठी भाषेला सन्मान दिला जात नाही़ याबाबत शासनाची तज्ज्ञ समिती निर्णय घेणार आहे पण त्यांना कोणती अडचण येत आहे हेही कळायला तयार नाही़ दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे हे मात्र नक्की- प्रा़ सुहास पुजारी, मराठी अभ्यासक, सोलापूर

मराठी भाषेचे निकृष्टीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे़ अनेकांना मराठी भाषा येत नाही, हे सत्य आहे़ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाहीत़ लहान मुलांना शाळेत टाकण्यापेक्षा इतर गोष्टीत इंग्रजीचा आग्रह धरण्यात येत आहे़ गरिबातील गरीब माणूसही आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतील शिक्षण देत आहे़ शासनाचा वेळकाढूपणा व शरद पवार या दोघांमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्याची खंत आहे़- दत्ता गायकवाड,साहित्यिक, सोलापूर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही याबाबत खंत करण्यापेक्षा मराठी भाषेचा विकास वेगवेगळ्या अंगाने करता येतो हे सत्य आहे़ शिक्षणाचे माध्यम मराठी हे तात्विक आहे़ भाषेच्या वापराने भाषा समृद्ध होते़ मराठीचा वापर वेगाने करायला हवा़ भाषा ही सरकारी अनुदानातून समृद्ध होत नाही़ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायलाच हवा़ शासनाकडून मराठी भाषेवर होत असलेला अन्याय योग्य नाही़ तरी शासनाने लवकरात लवकर दर्जा मिळवून द्यावा़- गो़मा़ पवार, ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन