शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

प्रदूषित सोलापुरातील हवा शुद्ध करण्यासाठी केंद्राचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:04 IST

नवी दिल्ली : वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील १०२ शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत ...

ठळक मुद्देदिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणारशहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दोन वर्षांत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतीलआगामी पाच वर्षांत २० ते ३० टक्के प्रदूषण कमी होईल

नवी दिल्ली : वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील १०२ शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये सर्वाधिक १७ शहरे महाराष्ट्रातील आहेत. यात सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली,  उल्हासनगर यांचा समावेश आहे. या सर्वाधिक प्रदूषित शहरातील हवा आगामी पाच वर्षांत शुद्ध करण्यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्ष वर्धन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाची (एनसीएपी) घोषणा केली आहे.   

हवेच्या गुणवत्तेबाबत डब्ल्यूएचओ आणि अन्य एजन्सीच्या २०११ ते २०१८ च्या दरम्यान आलेल्या अहवालाच्या आधारे या शहरांची निवड करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील १५, मध्यप्रदेश ७, बिहार ३, गुजरात २, झारखंड १ शहरांचा समावेश आहे. दिल्लीही याच योजनेचा भाग आहे. या शहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दोन वर्षांत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. 

केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, प्रदूषणामुळे देश आणि जगातील शहरे त्रस्त आहेत. १०२ शहरांत २०२४ पर्यंत राज्य सरकारांसोबत प्रयत्न करण्यात येतील. प्रदूषण रोखण्यासाठी योजना तयार करण्यास या शहरांना सांगितले जाईल. त्यानुसार पर्यावरण मंत्रालय शहरांसाठी बजट देईल. केंद्र सरकार जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र, ब्लूमबर्ग यासारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या मदतीने या शहरांत प्रदूषण रोखण्यासाठी योजना तयार करील. केंद्रीय पर्यावरण सचिव सी.के. मिश्रा यांनी सांगितले की, औपचारिक घोषणेसोबत योजनेवर काम सुरू झाले आहे. या शहरांमध्ये आगामी पाच वर्षांत २० ते ३० टक्के प्रदूषण कमी होईल. 

जीवन गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज- नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की, दर एक मिनिटाला शहरांकडे ३० लोक धाव घेत आहेत. अशावेळी स्मार्ट सिटी विकसित करणे आणि लोकांच्या जीवन गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणCentral Governmentकेंद्र सरकार