शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषित सोलापुरातील हवा शुद्ध करण्यासाठी केंद्राचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:04 IST

नवी दिल्ली : वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील १०२ शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत ...

ठळक मुद्देदिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणारशहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दोन वर्षांत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतीलआगामी पाच वर्षांत २० ते ३० टक्के प्रदूषण कमी होईल

नवी दिल्ली : वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील १०२ शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये सर्वाधिक १७ शहरे महाराष्ट्रातील आहेत. यात सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली,  उल्हासनगर यांचा समावेश आहे. या सर्वाधिक प्रदूषित शहरातील हवा आगामी पाच वर्षांत शुद्ध करण्यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्ष वर्धन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाची (एनसीएपी) घोषणा केली आहे.   

हवेच्या गुणवत्तेबाबत डब्ल्यूएचओ आणि अन्य एजन्सीच्या २०११ ते २०१८ च्या दरम्यान आलेल्या अहवालाच्या आधारे या शहरांची निवड करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील १५, मध्यप्रदेश ७, बिहार ३, गुजरात २, झारखंड १ शहरांचा समावेश आहे. दिल्लीही याच योजनेचा भाग आहे. या शहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दोन वर्षांत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. 

केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, प्रदूषणामुळे देश आणि जगातील शहरे त्रस्त आहेत. १०२ शहरांत २०२४ पर्यंत राज्य सरकारांसोबत प्रयत्न करण्यात येतील. प्रदूषण रोखण्यासाठी योजना तयार करण्यास या शहरांना सांगितले जाईल. त्यानुसार पर्यावरण मंत्रालय शहरांसाठी बजट देईल. केंद्र सरकार जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र, ब्लूमबर्ग यासारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या मदतीने या शहरांत प्रदूषण रोखण्यासाठी योजना तयार करील. केंद्रीय पर्यावरण सचिव सी.के. मिश्रा यांनी सांगितले की, औपचारिक घोषणेसोबत योजनेवर काम सुरू झाले आहे. या शहरांमध्ये आगामी पाच वर्षांत २० ते ३० टक्के प्रदूषण कमी होईल. 

जीवन गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज- नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की, दर एक मिनिटाला शहरांकडे ३० लोक धाव घेत आहेत. अशावेळी स्मार्ट सिटी विकसित करणे आणि लोकांच्या जीवन गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणCentral Governmentकेंद्र सरकार