शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

प्रदूषित सोलापुरातील हवा शुद्ध करण्यासाठी केंद्राचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:04 IST

नवी दिल्ली : वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील १०२ शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत ...

ठळक मुद्देदिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणारशहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दोन वर्षांत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतीलआगामी पाच वर्षांत २० ते ३० टक्के प्रदूषण कमी होईल

नवी दिल्ली : वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील १०२ शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर कठोर नियम लागू करून तेथील हवेतील गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये सर्वाधिक १७ शहरे महाराष्ट्रातील आहेत. यात सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली,  उल्हासनगर यांचा समावेश आहे. या सर्वाधिक प्रदूषित शहरातील हवा आगामी पाच वर्षांत शुद्ध करण्यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्ष वर्धन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाची (एनसीएपी) घोषणा केली आहे.   

हवेच्या गुणवत्तेबाबत डब्ल्यूएचओ आणि अन्य एजन्सीच्या २०११ ते २०१८ च्या दरम्यान आलेल्या अहवालाच्या आधारे या शहरांची निवड करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील १५, मध्यप्रदेश ७, बिहार ३, गुजरात २, झारखंड १ शहरांचा समावेश आहे. दिल्लीही याच योजनेचा भाग आहे. या शहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दोन वर्षांत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. 

केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, प्रदूषणामुळे देश आणि जगातील शहरे त्रस्त आहेत. १०२ शहरांत २०२४ पर्यंत राज्य सरकारांसोबत प्रयत्न करण्यात येतील. प्रदूषण रोखण्यासाठी योजना तयार करण्यास या शहरांना सांगितले जाईल. त्यानुसार पर्यावरण मंत्रालय शहरांसाठी बजट देईल. केंद्र सरकार जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र, ब्लूमबर्ग यासारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या मदतीने या शहरांत प्रदूषण रोखण्यासाठी योजना तयार करील. केंद्रीय पर्यावरण सचिव सी.के. मिश्रा यांनी सांगितले की, औपचारिक घोषणेसोबत योजनेवर काम सुरू झाले आहे. या शहरांमध्ये आगामी पाच वर्षांत २० ते ३० टक्के प्रदूषण कमी होईल. 

जीवन गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज- नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की, दर एक मिनिटाला शहरांकडे ३० लोक धाव घेत आहेत. अशावेळी स्मार्ट सिटी विकसित करणे आणि लोकांच्या जीवन गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणCentral Governmentकेंद्र सरकार