शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 16:29 IST

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम ...

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे

राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे व राज्यातील युती सरकारचे जाहीर आभार मानतो. या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यभर अनेक आंदोलने, उपोषण केली. भाजपच्या ओबीसी मोर्चानेही सातत्याने यात मोठा सहभाग घेतला. राज्यात पुन्हा युतीचे सरकार आल्यावर लगेच हे आरक्षण पुन्हा मिळणे हा मोठा योगायोग आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा चांगला पायगुण आहे, असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी केले.

ओबीसी आरक्षण जाहीर होताच भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी आमदार समाधान आवताडे यांना पेढे भरवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठपुराव्याबाबत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार समाधान आवताडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, विजय माने, दिगंबर यादव, अमोल माने, आदित्य मुद्गुल, सुदर्शन यादव, युवराज शिंदे,राजाराम कालिबाग,सतीश मोहिते,संजय माळी,सुहास पवार रामदास जाधव दादा माळी विकास खिलारे मधू कुटे सचिन अकळे पिंटू भुसे  सुशांत हजारे अजित हजारे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजेंड्यावर ओबीसी आरक्षणचा विषय घेवून कामास सुरवातही केली. आता येणाऱ्या सर्व निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार याचा सर्वात मोठा आनंद आज होत आहे. ओबीसी समाजाला २७ % राजकीय आरक्षण देण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याचे जाहीर झाल्यावर या निर्णयाचे भाजप युवा मोर्चाने स्वागत करत आ समाधान आवताडे यांच्या कार्यालयासमोर  जल्लोष केला. फटाके फोडून जल्लोषात सुप्रीम कोटांच्या निर्णयाचे स्वागत केले. भारतमाता की जय..... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचा विजय असो.....युती सरकारचा विजय असो... अश्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

गेल्या १५ महिन्यात राज्यातील आघाडी सरकारला जमले नाही ते काम केवळ १५ दिवसात शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवले. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले आहे.आघाडी सरकार मात्र ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे.- विवेक खिलारे , जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा

टॅग्स :SolapurसोलापूरOBC Reservationओबीसी आरक्षणPoliticsराजकारणBJPभाजपा