शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 16:29 IST

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम ...

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे

राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे व राज्यातील युती सरकारचे जाहीर आभार मानतो. या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यभर अनेक आंदोलने, उपोषण केली. भाजपच्या ओबीसी मोर्चानेही सातत्याने यात मोठा सहभाग घेतला. राज्यात पुन्हा युतीचे सरकार आल्यावर लगेच हे आरक्षण पुन्हा मिळणे हा मोठा योगायोग आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा चांगला पायगुण आहे, असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी केले.

ओबीसी आरक्षण जाहीर होताच भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी आमदार समाधान आवताडे यांना पेढे भरवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठपुराव्याबाबत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार समाधान आवताडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, विजय माने, दिगंबर यादव, अमोल माने, आदित्य मुद्गुल, सुदर्शन यादव, युवराज शिंदे,राजाराम कालिबाग,सतीश मोहिते,संजय माळी,सुहास पवार रामदास जाधव दादा माळी विकास खिलारे मधू कुटे सचिन अकळे पिंटू भुसे  सुशांत हजारे अजित हजारे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजेंड्यावर ओबीसी आरक्षणचा विषय घेवून कामास सुरवातही केली. आता येणाऱ्या सर्व निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार याचा सर्वात मोठा आनंद आज होत आहे. ओबीसी समाजाला २७ % राजकीय आरक्षण देण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याचे जाहीर झाल्यावर या निर्णयाचे भाजप युवा मोर्चाने स्वागत करत आ समाधान आवताडे यांच्या कार्यालयासमोर  जल्लोष केला. फटाके फोडून जल्लोषात सुप्रीम कोटांच्या निर्णयाचे स्वागत केले. भारतमाता की जय..... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचा विजय असो.....युती सरकारचा विजय असो... अश्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

गेल्या १५ महिन्यात राज्यातील आघाडी सरकारला जमले नाही ते काम केवळ १५ दिवसात शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवले. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले आहे.आघाडी सरकार मात्र ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे.- विवेक खिलारे , जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा

टॅग्स :SolapurसोलापूरOBC Reservationओबीसी आरक्षणPoliticsराजकारणBJPभाजपा