शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 16:29 IST

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम ...

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे

राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे व राज्यातील युती सरकारचे जाहीर आभार मानतो. या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यभर अनेक आंदोलने, उपोषण केली. भाजपच्या ओबीसी मोर्चानेही सातत्याने यात मोठा सहभाग घेतला. राज्यात पुन्हा युतीचे सरकार आल्यावर लगेच हे आरक्षण पुन्हा मिळणे हा मोठा योगायोग आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा चांगला पायगुण आहे, असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी केले.

ओबीसी आरक्षण जाहीर होताच भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी आमदार समाधान आवताडे यांना पेढे भरवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठपुराव्याबाबत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार समाधान आवताडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, विजय माने, दिगंबर यादव, अमोल माने, आदित्य मुद्गुल, सुदर्शन यादव, युवराज शिंदे,राजाराम कालिबाग,सतीश मोहिते,संजय माळी,सुहास पवार रामदास जाधव दादा माळी विकास खिलारे मधू कुटे सचिन अकळे पिंटू भुसे  सुशांत हजारे अजित हजारे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजेंड्यावर ओबीसी आरक्षणचा विषय घेवून कामास सुरवातही केली. आता येणाऱ्या सर्व निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार याचा सर्वात मोठा आनंद आज होत आहे. ओबीसी समाजाला २७ % राजकीय आरक्षण देण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याचे जाहीर झाल्यावर या निर्णयाचे भाजप युवा मोर्चाने स्वागत करत आ समाधान आवताडे यांच्या कार्यालयासमोर  जल्लोष केला. फटाके फोडून जल्लोषात सुप्रीम कोटांच्या निर्णयाचे स्वागत केले. भारतमाता की जय..... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचा विजय असो.....युती सरकारचा विजय असो... अश्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

गेल्या १५ महिन्यात राज्यातील आघाडी सरकारला जमले नाही ते काम केवळ १५ दिवसात शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवले. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले आहे.आघाडी सरकार मात्र ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे.- विवेक खिलारे , जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा

टॅग्स :SolapurसोलापूरOBC Reservationओबीसी आरक्षणPoliticsराजकारणBJPभाजपा