शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Breaking; अरे देवा...सांगोल्यात कालवा फुटला; लाखो लिटर पाणी पिकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:08 IST

दुष्काळात तेरावा महिना; शेतकऱ्यांच्या शेताचे व पिकांचे नुकसान

सांगोला : लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी व आपत्कालीन दरवाजा न उघडल्यामुळे नीरा उजवा कालवा अंतर्गत सांगोला शाखा कालवा क्र. ५ कि.मी ४४ ला फुटून भगदाड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जावू लागल्याने  'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  दरम्यान अचानक कालवा फुटल्याने नजीकच्या शेतकऱ्यांच्या ४ विहिरी पाण्याने बुजून शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान कालवा बुजविण्याच्या ठिकाणी यंत्रसामुग्री जाण्यास अडचण येत असल्याने कालवा बुजविण्यास विलंब लागणार आहे .ही घटना काल गुरूवार ११ जून रोजी तीनच्या सुमारास चिणके (ता.सांगोला) येथील सोनारसिध्द मंदिराजवळ घडली आहे. 

नीरा उजवा कालवा अंतर्गत सांगोला शाखा कालवा क्रमांक ५ ला उन्हाळी आवर्तनाचे १० दिवसापूर्वी पाणी सोडले आहे मात्र लघुपाटबंधारे बांधकाम अधिकारी यांच्यातील नियोजनाअभावी शेतकरीच पाणी वाटपाचे नियोजन करीत आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  दरम्यान सांगोला शाखा कालवा क्र ५ चिनके गावाच्या सोनारसिद्ध मंदिराजवळून पुढे जात आहे गावालगत असणाऱ्या ओढ्यावर शिवकालीन बंधारा असून या बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती तसे निवेदन ही तहसीलदार व पाटबंधारे अधिकारी यांना दिले होते, दरम्यान या कालव्याच्या शिवकालीन बंधाऱ्याच्या आपत्कालीन दरवाजाला अधिकाऱ्यांनी शेतकरी दरवाजा काढून पाणी घेतील म्हणून वेल्डिंग करून दरवाजा बंद केला होता.

कालव्यातून २०० क्यूसेसचा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व आपत्कालीन दरवाजा न उघडल्यामुळे किमी ४४ ला कालव्यास भगदड पडून फुटला. अचानक हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांची धावाधाव सुरू झाली .कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने कालव्या नजीकच्या देवानंद मिसाळ , महादेव मिसाळ , हरिभाऊ खराडे ,अंकुश चव्हाण या चार शेतकऱ्यांच्या विहिरी पाण्याने व गाळाने बुजून गेल्या आहेत . कालवा फुटून पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरून नुकसान झाले आहे, त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाwater transportजलवाहतूकagricultureशेतीFarmerशेतकरी