शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
3
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
6
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
7
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
10
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
11
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
12
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
13
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
14
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
15
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
16
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
17
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
18
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
19
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणोत्सव; सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले तरच फुलपाखरू छान दिसेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:31 IST

बटरफ्लाय मंथ : रसायनांचा मर्यादित वापर, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनाची गरज

ठळक मुद्देबटरफ्लाय मंथ निमित्ताने विविध विज्ञान महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते विजापूर रोड परिसरातील स्मृती उद्यान येथे असलेल्या बटरफ्लाय गार्डन येथे अनेक विद्यार्थी भेटी देतातज्या ठिकाणी फुलपाखरु आढळतात तो भाग पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला समजला जातो

सोलापूर : आपल्या आजूबाजूला बागडणाºया फुलपाखरांना पाहून प्रत्येकाचे मन आनंदी होते. या आनंदी करणाºया फुलपाखरांची संख्या कमी होत असल्याचे संशोधन जागतिक स्तरावर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. माळरान हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचे विभाजन झाल्याने फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम होत आहे. रसायनांचा मर्यादित वापर आणि सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले तरच एका मराठी गीताप्रमाणे फुलपाखरू छान किती दिसते, असे म्हणता येईल.

फुलपाखरे फुलांवरील मकरंद गोळा करण्याच्या उद्देशाने अनेक झाडांना भेटी देत असतात. त्या वेळी त्यांच्या पंखांना, शरीराला चिकटलेल्या परागकणांचा इतर फुलांतील बीजांडाशी मेळ होतो. यालाच परागीभवन म्हणतात. यात फुलपाखरांची महत्त्वाची भूमिका असते.  

विविध प्रजातींची फुलपाखरे एखाद्या ठिकाणी असणे हे त्या ठिकाणच्या नैसर्गिकतेचे प्रतीक समजले जाते. फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम झाल्यास परिसंस्थेवरही तो दिसून येतो. अंडी, त्यातून बाहेर येणाºया अळ्या, अळ्यांनी विणलेले कोष आणि त्यातून बाहेर येणारे फुलपाखरू असे त्यांचे जीवनचक्र असते. फुलपाखरांना वैविध्यपूर्ण समृद्ध वनस्पती संपदेचे परिमाण मानले जाते. गेल्या काही वर्षांत जंगलतोड, वाढते शहरीकरण, शेतीतील बदल, रसायनांचा वापर या कारणांमुळे फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.  नष्ट होत असलेले झुडपांचे प्रदेश, कीटकनाशकांचा वापर यामुळे फुलपाखरे संकटात आहेत. शेतकरी तसेच इतरांना फुलपाखरांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे त्यांना नैसर्गिक अधिवास देण्यासाठी प्रयत्न करता येईल.

बटरफ्लाय गार्डनची संकल्पनामागील काही वर्षांपासून बटरफ्लाय गार्डनची संकल्पना देशात रुजत आहे. सोलापुरात त्याचे प्रमाण कमी आहे. बटरफ्लाय गार्डन म्हणजे असा बगीचा जेथे अनेक प्रकारची फुलपाखरे एखाद्या छोट्या जागेत कमी वेळात बघता येतील. बटरफ्लाय गार्डन म्हणजेच फुलपाखरांचे उद्यान किंवा बाग. विजापूर रोड येथील स्मृती उद्यानात बटरफ्लाय गार्डन उभारण्यात आले आहे. तिथे विद्यार्थी कुतूहल म्हणून भेट देत असतात. फुलपाखरांच्या उद्यानात त्यांना बंदिस्त केलेले नसते, तर त्यांच्या सर्व नैसर्गिक गरजा पूर्ण होत असल्याने फुलपाखरेच येथे मोठ्या संख्येत जमतात. फुलपाखरे स्वत:हून या उद्यानात ये-जा करतात. मुक्तपणे बागडतात. 

पारंपरिक शेती पद्धतीत बदलाचा फुलपाखरांच्या संख्येवर परिणामसोलापूर जिल्हा हा कमी पावसाचा म्हणून ओळखला जातो. पारंपरिकपणे येथे कमी पावसावर आधारित शेती केली जाते. पाण्याच्या योजना, विहिरी, बोअर यांमुळे शेतीच्या पद्धतीत बदल झाला. शेतीमध्ये घेण्यात येणारी पिके देखील बदलली. यामुळे फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम झाला. कॉमन सिल्व्हर लाईन, ग्रास ब्लू, प्लेन क्युपीड, ग्रास ज्वेल, टायनी ग्रास ब्लू, लाईन ब्लू या माळरानावर दिसणाºया फुलपाखरांच्या संख्येची घट झाल्याचे निरीक्षणातून पुढे आले आहे.

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना फुलपाखरांविषयी प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती द्यावी. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन जागृतीचे काम करायला हवे. शेतकºयांनाही रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समजावल्यास फुलपाखरांची संख्या पुन्हा वाढू शकते.- डॉ. राजशेखर हिप्परगी, प्राणिशास्त्र विभाग, वालचंद महाविद्यालय

ज्या ठिकाणी फुलपाखरु आढळतात तो भाग पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला समजला जातो. लॉकडाऊनदरम्यान वातावरणात प्रदूषण कमी असल्याने अनेक ठिकाणी फुलपाखरु पाहायला मिळाले. या प्रकारचे वातावरण त्यांच्या संख्यावाढ व अधिवासाला पूरक असते. - सागर कांबळे,पर्यावरणप्रेमी

महाविद्यालयीन उपक्रम आणि स्मृती उद्यानातील बटरफ्लाय पार्कबटरफ्लाय मंथ निमित्ताने विविध विज्ञान महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. विजापूर रोड परिसरातील स्मृती उद्यान येथे असलेल्या बटरफ्लाय गार्डन येथे अनेक विद्यार्थी भेटी देतात. तिथे नैसर्गिक पद्धतीने फुलपाखरांसाठी बाग तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरण