शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण कोरोना मृतांवर शहरातच दहन; स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:29 IST

किमान बारा तासांची प्रतीक्षा : शववाहिका, लाकूड, गोवºया मिळण्यातही अडचण

ठळक मुद्देकोरोना मृतांची वाढती संख्या व नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू  यामुळे शववाहिका चालकांवर कधी नव्हे तो कामाचा ताण आला सोलापूर महापालिकेच्या चार वाहनांमधून सध्या सरासरी चार ते पाच मृतदेह विविध स्मशानभूमीत पाठविले जातातजून, जुलै महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्यामुळे एका-एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते दिवस लागायचे

राकेश कदम

सोलापूर : ग्रामीण भागातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांवर शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी वेटिंग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीत आणखी एका विद्युत दाहिनीचे तर अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरात मे, जून आणि जुलै महिन्यात कोरोनाचा कहर झाला होता. दररोज सरासरी सहा ते सात लोकांचा मृत्यू व्हायचा. नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. अंत्यसंस्कारासाठी दोन- दोन दिवस लागत होते. आॅगस्ट महिन्यात शहरातील कोरोना नियंत्रणात आला; मात्र ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींना शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मरण पावलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या ताब्यात देण्यात येते.

महापालिकेचे कर्मचारी नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील लोक शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मोदी स्मशानभूमी, रुपाभवानी स्मशानभूमीत मृतदेह दहनाला वेळ लागत आहे. लाकडे, गोवºया वेळेवर मिळत नाही. पावसाच्या दिवसांमुळे मृतदेहाचे दहन होण्यासही विलंब लागत असल्याचे मोदी स्मशानभूमीतील राजू डोलारे यांनी सांगितले.

आजही लागतात १२ तासकोरोना मृतांची वाढती संख्या व नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू  यामुळे शववाहिका चालकांवर कधी नव्हे तो कामाचा ताण आला आहे. सोलापूर महापालिकेच्या चार वाहनांमधून सध्या सरासरी चार ते पाच मृतदेह विविध स्मशानभूमीत पाठविले जातात. जून, जुलै महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्यामुळे एका-एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते दिवस लागायचे. आता एखाद्या मृत व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असेल तर मृतदेह बाजूला ठेवला जातो. परंतु सकाळी मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायला आजही किमान १२ तासांचा कालावधी लागत असल्याचे लादेन शेख यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या