शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रामीण कोरोना मृतांवर शहरातच दहन; स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:29 IST

किमान बारा तासांची प्रतीक्षा : शववाहिका, लाकूड, गोवºया मिळण्यातही अडचण

ठळक मुद्देकोरोना मृतांची वाढती संख्या व नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू  यामुळे शववाहिका चालकांवर कधी नव्हे तो कामाचा ताण आला सोलापूर महापालिकेच्या चार वाहनांमधून सध्या सरासरी चार ते पाच मृतदेह विविध स्मशानभूमीत पाठविले जातातजून, जुलै महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्यामुळे एका-एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते दिवस लागायचे

राकेश कदम

सोलापूर : ग्रामीण भागातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांवर शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी वेटिंग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीत आणखी एका विद्युत दाहिनीचे तर अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरात मे, जून आणि जुलै महिन्यात कोरोनाचा कहर झाला होता. दररोज सरासरी सहा ते सात लोकांचा मृत्यू व्हायचा. नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. अंत्यसंस्कारासाठी दोन- दोन दिवस लागत होते. आॅगस्ट महिन्यात शहरातील कोरोना नियंत्रणात आला; मात्र ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींना शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मरण पावलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या ताब्यात देण्यात येते.

महापालिकेचे कर्मचारी नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील लोक शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मोदी स्मशानभूमी, रुपाभवानी स्मशानभूमीत मृतदेह दहनाला वेळ लागत आहे. लाकडे, गोवºया वेळेवर मिळत नाही. पावसाच्या दिवसांमुळे मृतदेहाचे दहन होण्यासही विलंब लागत असल्याचे मोदी स्मशानभूमीतील राजू डोलारे यांनी सांगितले.

आजही लागतात १२ तासकोरोना मृतांची वाढती संख्या व नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू  यामुळे शववाहिका चालकांवर कधी नव्हे तो कामाचा ताण आला आहे. सोलापूर महापालिकेच्या चार वाहनांमधून सध्या सरासरी चार ते पाच मृतदेह विविध स्मशानभूमीत पाठविले जातात. जून, जुलै महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्यामुळे एका-एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते दिवस लागायचे. आता एखाद्या मृत व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असेल तर मृतदेह बाजूला ठेवला जातो. परंतु सकाळी मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायला आजही किमान १२ तासांचा कालावधी लागत असल्याचे लादेन शेख यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या