शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

सोलापूर-विजापूर चौपदरीकरणाचे बजेट ५२८ कोटींनी वाढले, दोनदा कंत्राटदारांची माघार, आता तिसºयांदा कराराच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:37 IST

सोलापूर-विजापूर राष्टÑीय महामार्ग क्र. १३ च्या चौपदरीकरणाची १५७६ कोटी रुपयांची निविदा नुकतीच आयजेएम कंपनीने घेतली आहे.

ठळक मुद्देकाम पूर्ण झाल्यानंतर हे पैसे टोलद्वारे वाहनधारकांच्या खिशातूनच वसूल होणारआजवर दोन वेळा दोन कंपन्यांनी या महामार्गाचे काम घेऊन सोडले सोलापूर-विजापूर  या ११० किमी महामार्गाच्या  चौपदरीकरणाची चर्चाटाकळी येथील भीमा नदीवरील पूल पूर्वी आहे तोच ठेवण्यात येणार

राकेश कदम सोलापूर दि १३ : सोलापूर-विजापूर राष्टÑीय महामार्ग क्र. १३ च्या चौपदरीकरणाची १५७६ कोटी रुपयांची निविदा नुकतीच आयजेएम कंपनीने घेतली आहे. सध्या महामार्ग प्राधिकरण आणि कंपनीमध्ये करार प्रक्रिया सुरू आहे. आजवर दोन वेळा दोन कंपन्यांनी या महामार्गाचे काम घेऊन सोडले होते. या काळात या कामाची किंमत ५२८ कोटींनी वाढली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हे पैसे टोलद्वारे वाहनधारकांच्या खिशातूनच वसूल होणार आहेत. २०११ पासून सोलापूर-विजापूर  या ११० किमी महामार्गाच्या  चौपदरीकरणाची चर्चा आहे. याचदरम्यान सुरू झालेले सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद चौपदरीकरणाचे काम निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. २०१२ मध्ये पहिली निविदा काढण्यापूर्वीच सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणे अपेक्षित होते. या कामांतर्गत बाळे ते हत्तूर या दरम्यान २१ किमी बायपास होणार आहे. यातील काही जमीन माळढोक अभयारण्य परिक्षेत्रात येते. वन्यजीव विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र येण्यास वेळ लागला. त्यामुळे दीड वर्षानंतर ठेकेदाराने काम सोडून दिले. आता तिसरी निविदा नुकतीच मंजूर झाली आहे. हा करार मार्चअखेर पूर्ण होेण्याची शक्यता आहे.  -------------------------या अशा तीन तºहा  - मे २०१२ रोजी सद्भाव इंजिनिअरिंग प्रा.लि.ने १०४८ कोटी रुपयांना निविदा घेतली. बायपाससाठी वन्यजीव विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र येण्यास वेळ लागला. त्यामुळे २१ आॅक्टोबर २०१३ रोजी सद्भावने काम सोडून दिले. - महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा ३० जुलैै २०१४ रोजी दुसरी निविदा काढली. २० मार्च २०१५ रोजी युनिक्वेस्ट इन्फ्रा कंपनीची १३७७.५४ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. काही दिवसातच कंपनीला हे काम परवडत नसल्याची उपरती झाली. त्यामुळे त्यांनीही माघार घेतली. ५ नोव्हेंबर २०१५ ला महामार्ग प्राधिकरणाने या कंपनीसोबत करार रद्द करून बँक गॅरंटी जप्त केली. - २१ जुलैै २०१७ रोजी तिसरी निविदा काढण्यात आली. १६ नोव्हेंबर २०१७ रोजी हैदराबाद येथील आयजेएम कंपनीची निविदा मंजूर झाली. या कंपनीने १५७६.७९ कोटी रुपयांना हे काम घेतले आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि आयजेएममध्ये सध्या करार प्रक्रिया सुरू आहे. मार्च २०१८ अखेर करार प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे अधिकारी सांगत आहेत. -----------------सोलापूर-विजापूर चौपदरीकरणाच्या कामात काही बदल करण्यात आले आहेत. टाकळी येथील भीमा नदीवरील पूल पूर्वी आहे तोच ठेवण्यात येणार होता. आता त्याजागी नवे दोन पूल होतील. अशा प्रकारे अनेक कामात बदल केलेले आहेत. त्यामुळे या कामाची किंमत ५२८ कोटी रुपयांनी वाढली आहे. मार्चअखेर निविदा करार पूर्ण होतील. त्यानंतर कामालाही सुरुवात होईल. - वसंत पंधारकर, उपमहाव्यवस्थापक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. 

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्ग