शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Breaking; बार्शी-भूम महामार्ग शेतकऱ्यांनी अडविला; जाणून घ्या नेमकं कारण 

By appasaheb.patil | Updated: September 22, 2022 13:17 IST

अतिवृष्टी व पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून शेतकरी आक्रमक

सोलापूर :  अतिवृष्टी व पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून गुरूवारी सकाळी पुन्हा अतिवृष्टीतून वगळलेले बार्शी तालुक्यातील शेतकरी, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी- भूम मार्गावरील आगळगाव येथे रस्त्यावर उतरले.

सरकारविरोधी घोषणा देत सुमारे एक तास हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन बार्शीचे नायब तहसीलदार संजीवन मुंढे व आगळगाव मंडळ अधिकारी सारिका राऊत यांनी स्वीकारले. या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार राजेंद्र मंगरूळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता. यावेळी मुन्ना डमरे, सुनील माने, मुकेश डमरे, चुंबच्या सरपंच सुषमा जाधवर, कळंबवाडीच्या सरपंच प्रभावती मुंढे, भानसळेच्या सरपंच शकुंतला हिरे, मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे, भोयरेचे सरपंच दशरथ टेकाळे, काटेगावचे सरपंच चंद्रसेन गवळी, आगळगावच्या सरपंच पुतळाबाई गरड आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले की, वारंवार शांततेच्या मार्गाने निवेदने देऊन व आंदोलने करून सुद्धा शासन झोपलेलच आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये! अन्यथा ठरल्याप्रमाणे शेतकरी मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिला. पोपट डमरे, शरद उकिरडे, दिगंबर विधाते आदींची यावेळी भाषणे झाली.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर