शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटणाऱ्या बहाद्दूर हौसाक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST

हौसाक्का पाटील चार वर्षाच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या ...

हौसाक्का पाटील चार वर्षाच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा आहे, असे म्हणून त्यांना सांभाळलं. चिमुकल्या वयामध्ये हौसाक्का हातात तिरंगा घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध रस्त्यावरती आल्या. त्यांच्या जडणघडणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना वेळ मिळाला नाही.

हौसाक्का यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि ब्रिटिशांचं जुलमी राज्य नष्ट व्हावं, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला. सुरलीच्या घाटात ब्रिटिशांच्या गाडीवर छापा टाकला. वांगी इथला ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. भवानीनगर रेल्वे स्थानकावर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून योजना आखली आणि ती त्यांनी यशस्वी करुन दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजीत पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्येच होते.

पुरुषांप्रमाणे स्त्रियादेखील हिंमतवान, निर्भीड, लढवय्या आणि महाबुद्धिमान असतात हे हौसाक्कांनी दाखवून दिलं. त्यांच्या सारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही त्या शांत बसल्या नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा, यासाठी सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या.

तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यानंतर हौसाक्का चवताळून उठल्या. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांनी जाहीर सभेत या पुरस्काराला विरोध केला. सांगलीत शिवसन्मान जागर परिषदेमध्ये काहीजणांनी जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला, त्यावेळेस त्याच कार्यक्रमात हातात काठी घेऊन त्या उभ्या राहिल्या.

हौसाक्का पाटील यांची हिंमत, निर्भीडपणा, स्वाभिमान, बाणेदारपणा, तळमळ, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. त्या केवळ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि भाई भगवानराव मोरे पाटील यांच्या पत्नी एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही तर, त्या देखील स्वतः शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.

हौसाक्कांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेकवेळा छापा टाकला. बालपणापासून त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यानंतरही अनेक आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास झाला. पण, त्या डगमगल्या नाहीत. संकटसमयी त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले. त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभलं. हौसाक्का पाटील या स्वातंत्र्यासाठी लढल्या. आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरती त्या अनंतात विलीन झाल्या. इतिहास पाहिलेल्या, इतिहास घडवलेल्या आणि वर्तमानाला प्रेरणा देणाऱ्या त्या ऐतिहासिक महामानव आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता आपल्या सर्वांना व्यथित करणारी आहे.

आम्ही हौसाक्का पाटील यांना अनेकवेळा भेटायला जायचो. त्यामुळे त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांना पाहिल्यानंतर प्रेरणा मिळत असे. त्या इतिहासातील महामानव आहेत तर, वर्तमानातील दीपस्तंभ आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

- डॉ. श्रीमंत कोकाटे (लेखक इतिहास संशोधक आहेत.)

-----