शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बोट चालकांना प्रशिक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:41 AM

विस्तीर्ण अशा जलाशयामुळे जलविहार करण्याची येथे मोठी संधी असून, पर्यटक या संधीचा लाभ घेतात. मात्र, गत काही वर्षांपासून पर्यटक ...

विस्तीर्ण अशा जलाशयामुळे जलविहार करण्याची येथे मोठी संधी असून, पर्यटक या संधीचा लाभ घेतात. मात्र, गत काही वर्षांपासून पर्यटक बोटीतून जलविहार करत असताना बोट उलटून जीवितहानीच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशीच एक ताजी घटना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी करमाळा तालुक्यातील वांगी येथे उजनीच्या बॅकवाॅटरमधे घडली. नौकाविहार करत असताना नाविकाचे बोटीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे बोट उलटून अकलूज येथील पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उजनी जलाशयात नौकाविहार करताना वारंवार दुर्दैवी घटना घडत असल्यामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

शासनाने यावर उपाययोजना म्हणून नौकाविहारासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचा सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करावा, बोटी चालविणाऱ्या नाविकांना प्रशिक्षणाची तरतूद शासनाकडून करावी. शासनाने शासकीय किंवा परवाना पद्धतीने बोटिंग व्यवस्था करण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटकांना लाइफ जाकिटाची सुविधा उपलब्ध करून शासनाकडून उजनी जलाशयात बोटिंगसाठी पर्यटनस्थळे निश्चित करावीत.

जलविहार करीत असताना जलाशयावर पक्ष्यांच्या विलोभनीय कवायतींचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. सध्या काही तरुण मंडळी व मच्छीमार पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद देत आहेत. त्याकडे रोजगार निर्मितीचे मोठे साधन म्हणून पाहणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटकांची जेवढी सुरक्षेची काळजी घेता येईल, तेवढी खबरदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.

तरच अपघात टाळता येतील

पर्यटनवाढीसाठी शासनस्तरावर पर्यटन विकास केंद्र, पक्षी निरीक्षण केंद्र, मत्स्य अभ्यास केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र व्हावे, पक्षी निरीक्षणासाठी ठिकठिकाणी टॉवरची निर्मिती, पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न व्हावे, दुर्दैवी घटना टाळण्यासाठी बॅकवॉटरमध्ये ठिकठिकाणी नौकाविहारासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाइफ जाकीट पुरवावे, शासकीय वा परवाना पद्धतीने प्रशिक्षित बोटिंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात पर्यटकांच्या बोटींच्या अपघात घटना टाळता येतील, आदी मागण्या पर्यटनमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.