शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, पण...! चंद्रकांत पाटलांनी भाजपचं गणितच सांगितलं; पवारांनाही काढला चिमटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 15:08 IST

यावेळी रायगडावर लोकसभेपूर्वी तुतारी वाजतेय... वाजेल का...?' असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या ताब्यात गेल्यानंतर, निवडणूक आयोगाने नुकतेच शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असे नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह मिळाले आहे. शरद पवार गटाने या चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावर केले. यासंदर्भात बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तुताऱ्या वाजवा, नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू असे दिसत असल्याचे म्हटले आहे. ते सोलापूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? - यावेळी रायगडावर लोकसभेपूर्वी तुतारी वाजतेय... वाजेल का...?' असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू असं दिसायला लागलं आहे. मोदीजींची लोकप्रीयता जी वाढायला लागली आहे, एकाने फार छान विश्लेषण केले आहे की, मोदी जी हे जात पात भाषा धर्म याच्या वर गेले आणि एक लाभार्थी नावाचा गट त्यांनी निर्माण केला. तो म्हणतो, बाबानो तुमचं राजकारण राहुद्या बाजूला, आम्हाला मोदी हवे आहेत. याचे प्रत्यंतर अगदी  दोन महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसलं, तीन राज्यांच्या निवडणुकीत दिसलं." 

"शरद परावांनी असं म्हणायचंच असतं..."-"मध्यप्रदेशात एवढं मोठं एकतर्फी यश कधी मिळालंच नव्हतं भारतीय जनता पार्टीला. त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे... शेवटी विरोधी पक्षाने शेवटपर्यंत हार मानायचीच नसते ना. सारखं म्हणायचंच असतं, शरद परावांनी असं म्हणायचंच असतं की, माझे 20-22 येणार आहेत. नशीब ते 20-22 तरी देतायत इकडे. पण त्यांना हे कळून चुकले आहे की 45 वैगेरे काही नाही, बहुतेक 48 पर्यंत गाडी जाईल," असा चिमटाही पाटील यांनी शरद पवारांना काढला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणBJPभाजपा