शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:08 IST

कायदा करून राम मंदिर उभारता आले असते

ठळक मुद्देरामदास कदम पंढरपूर दौऱ्यावरउद्या उद्धव ठाकरे यांची पंढरपुरात होणार सभापाच लाखाहून अधिक शिवसैनिक पंढरपुरात होणार दाखल

पंढरपूर : गेल्या ३० वर्षांपासून निवडणूक आली की भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातोय़ गत निवडणुकीत या मुद्यावर देशातील जनतेसह हिंदूत्वावादी संघटनांनी भाजपाला पूर्ण बहुमत देत सत्तेत पाठविले़ मात्र त्यानंतरही सरकारने राममंदिराबाबत ठोस पावले उचलली नाहीत़ कायदा करून राम मंदिर उभारता आले असते पण ते केले नाही़ आता निवडणुका येताच त्यांच्याकडून पुन्हा हा मुद्दा पुढे येऊ लागला आहे़ ही चुकीची बाब आहे़ आजपर्यंत त्यांनी याच मुद्दयावर देशाची फसवणूक केली आहे़ अशी टिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.

पंढरपूर येथे २४ डिसेंबर रोजी ‘पहिले मंदिर, फिर सरकार’चा नारा देत शिवसेनेने महासभेचे आयोजन केले आहे़ यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, पदाधिकारी मोठे संख्येने पंढरपुरात दाखल होत आहेत़ पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महासभेचा तयारीचा आढावा घेतला व पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खा़ संजय राऊत, खा़ विनायक राऊत, खा. अनिल देसाई खा. अरविंद सावत, आ़ तानाजी सावंत, प्रा.शिवाजी सावंत, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संजनाताई घाडी, महिला आघाडी  जिल्हाप्रमुख शैला गोडसे, रवी मुळे, महावीर देशमुख, विनोद कदम आदी उपस्थित होते.

पंढरपूरची महासभा ही राज्यातील रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा विश्वास व्यक्त करीत रामदास कदम म्हणाले, राज्यातील व देशातील जनतेने मोठ्या विश्वासाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाला सत्तेसाठी भरभरून कौल दिला, मात्र सत्ता आल्यानंतर भाजपाने राम मंदिर, कर्जमाफी, दुष्काळ, बेरोजगारी आदी महत्वाच्या मुद्यावर हिंदूत्वादी संघटनांसह शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे़ आजपर्यंत त्यांनी धर्माच्या नावावर मते मागितली, मात्र राम मंदिर न उभारता स्वत:चा विकास केला़ भाजप सरकार राम मंदिर उभारत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने देशाच्या अस्मितेचा मुद्दा हाती घेत आयोद्येला जाऊन सर्व हिंदूत्वावादी संघटनांना एकत्रित करीत ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ चा नारा दिला़ शिवसेनेच्या या घोषणेला देशभरातून पाठिंबा मिळाला आहे.

पंढरीतील महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे केवळ राममंदिराचा मु्द्यावर बोलणार असे काही जन बोलत आहेत, मात्र शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावर मागे राहणार नाही़ आजपर्यंत शिवसेना बेरोजगारांच्या मागे ठामपणे उभे राहिली़ उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे सरकारला शेतकºयाची कर्जमाफी करावी लागली़ हे विसरून चालणार नाही़ पंढरीतील या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असेल उद्धव ठाकरे यांचा दौराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी १ च्या दरम्यान पंढरपुरात दाखल होतील़ विश्रामगृहावर काही निवडक पदाधिकाºयांच्या चर्चेनंतर दुपारी ३ वाजता सभास्थळी येतील़ प्रारंभी या सभेत वारकºयांचे प्रतिनिधी म्हणून ह़ भ़ प़ जयवंत महाराज बोधले, ह़ भ़ प़ देवव्रत (राणा) महाराज वासकर हे मार्गदर्शन करतील़ त्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी बोलतील़ ठीक ५ वाजता स्वत: उद्धव ठाकरे बोलण्यासाठी उभे  राहतील़ ६ वाजता सभा संपेल़ त्यानंतर ७ वाजता चंद्रभागा आरतीसाठी उद्धव ठाकरे हे चंद्रभागा नदीवरील इस्कान घाटावर पोहोचतील़ तेथे चंद्रभागेची आरती होईल़ तसेच शिवसेनेच्या वतीने चंद्रभागा नदीत हजारो दिवे सोडून चंद्रभागा प्रकाशमय करण्यात येईल़ उद्धव ठाकरे हे चंद्रभागेला नमस्कार करून राम मंदिर व्हावे, असा आशीर्वाद घेतील. 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Kadamरामदास कदमRam Mandirराम मंदिरBJPभाजपा