शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मोठी बातमी; निरा नदीने पाण्याची पातळी ओलांडली; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 16:35 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

अकलूज : तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर निरा खो-यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने वीर, भाटघर, निरा, देवघर व गुंजवणी या धरणातील पाण्याची पातळी वाढत असून आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वीर धरणाचे गेट क्र.५ साडे चार फुट उचलून नीरा नदीत ४ हजार ६३७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, तर उजवा कालव्याच्या विद्युतगृहातुन ८०० क्युसेक व डाव्या कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेस असे १ हजार १०० व धरणातून ४ ६३७ क्युसेक असा एकुण ५ हजार ७३७ क्युसेक इतका पाणी विसर्ग निरा नदीत सुरु झाल्याने वीर धरण प्रशासनाने निरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जुन व जुलै महिन्यातील पहीला आठवड्यापर्यत पावसाने दडी मारल्यानंतर गत महिन्यात निरा खो-यात ६ जुलैला पावसाला प्रारंभ झाला होता. निरा खो-यातील वीर, भाटघर, निरा-देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. १५ जुलै रोजी वीर धरण ९२ टक्के भरल्यानंतर धरणातुन निरा नदीत टप्प्याने पाणी सोडण्यात आले होते, त्यानंतर १९ जुलैला पावसाचा जोर ओसरल्याने निरा नदीत पाणी सोडण्याचे बंद करण्यात आले होते. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गत दोन दिवसापासून निरा खो-यात पावसाचे आगमन झाले असुन दोन दिवसाच्या पावसाने वीर, भाटघर, निरा-देवघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्यामुळे चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

वीर धरण ९७ टक्के भरले असल्यामुळे आज मंगळवारी वीर धरणातून ४ हजार ६३७ क्युसेक अधिक उजवा कालव्यातील विद्युतगृहातुन ८०० क्युसेक व डावा कालव्यातील विद्युतगृहातुन ३०० क्युसेक असा एकत्रित ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी ९ वाजता निरा नदीत सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार असल्याचे वीर धरणाचे उप अभियंता नलावडे यांनी माहिती दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरriverनदीmalshiras-acमाळशिरस