शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठ घेणार जिल्हा परिषदेच्या २५० शाळा दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 17:04 IST

विद्यांजली उपक्रम: गुणवत्ता वाढीसाठी करणार मदत

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ जिल्हा परिषदेच्या २५० शाळा दत्तक घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य व गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

केंद्र शासनाने विद्यापीठाला विद्यांजली उपक्रम राबविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्र. कुलसचिव डॉ. सुरेश पवार, अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. शिखरे, प्रा. डॉ. एस. पी. राजगुरू सहभागी झाले होते. विद्यांजली उपक्रमात जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेण्यात येतील, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक जबाबदारी व समुदायाच्या सहायाने शाळांना पायाभूत सुविधा व गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून मजबूत करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. १५ दिवसांत शाळांची निवड करण्यात येईल. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या जवळ असणाऱ्या दोन शाळा व ११५ महाविद्यालये दत्तक घेण्यात येतील.

शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षकांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय स्वच्छ सुंदर शाळांमुळे आला आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाचा विद्यांजली उपक्रम यशस्वी करू, असे सीईओ स्वामी यांनी यावेळी आश्वासन दिले.

हा होईल बदल

महाविद्यालये व शाळा दत्तक घेतल्याने कोरोनामुळे जी मुले घरी बसून शिक्षण घेत आहेत त्यांना चांगली मदत होईल. तसेच नमामी चंद्रभागा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नदीकाठच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेता येणार आहे. विद्यांजली उपक्रमात शाळेतील मुला- मुलींचा आहार, गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक मार्गदर्शन व सुविधा देण्यात येणार आहेत.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षणSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद