शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील आरटीओंचा नांदणी, मरवडे चेकपोस्ट होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 17:33 IST

राज्यातील २२ नाके रडारवर : अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त

सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर विजयपूर महामार्गावर असलेले नांदणी व मरवडे सीमा तपासणी नाके बंद करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील असे २२ नाके रडारवर असून, यासाठी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

आरटीओ कार्यालयांतर्गत राज्यात २२ सीमा तपासणी नाके कार्यरत आहेत. यातून केवळ २०० कोटी उत्पन्न मिळते. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे अद्ययावत, तर मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे सीमा तपासणी नाका कार्यरत आहे. नांदणी येथील सीमा तपासणी नाका खासगी संस्थेला देण्यात आला आहे. महामार्गावरून नॅशनल परमिट असलेली मालवाहू व प्रवासी वाहने धावतात. या वाहनांचे परमिट तपासून नवीन, तात्पुरता, महिना किंवा वार्षिक परमिट देण्याचे काम या सीमा तपासणी नाक्यावर चालते, तसेच ओव्हरलोडची तपासणी केली जाते; पण अलीकडच्या काळात हा सर्व व्यवहार ऑनलाइन झाला आहे. त्यामुळे सीमा तपासणी नाक्यावर गैरव्यवहार चालतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. या अनुषंगाने केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी सन २०१६ मध्ये मालवाहू वाहनांची कोठेही अडवणूक होणार नाही यासाठी सीमा तपासणी नाकेच बंद केली जातील अशी घोषणा केली होती.

दरम्यान, राज्यातील सरकार बदलले; पण नाके बंद झालेच नाहीत. केंद्र शासनाच्या योजना न राबविल्यामुळे जीएसटी थकविल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २६ एप्रिल रोजी राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करण्यासाठी अभ्यास समिती गठीत केली आहे. परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त दिनकर मनवर, तुळशीदास सोळंकी, राजेंद्र मदने, पुण्याचे आरटीओ अजित शिंदे हे सदस्य सीमा तपासणी नाक्याची गरज व उत्पन्नाची चाचपणी करणार आहेत. या समितीने दिलेल्या अहवालावरून सीमा तपासणी नाके चालू ठेवायचे की बंद हे ठरणार आहे.

मोटार निरीक्षकांना वेगळे काम

सीमा तपासणी नाक्याचे खासगीकरण झाल्यावर मोटार वाहन निरीक्षकांना केवळ निरीक्षणाचेच काम राहिले आहे. इतर राज्यातून आलेली वाहने ऑनलाइन तात्पुरता परवाना घेतातच. त्यामुळे केवळ ओव्हरलोड तपासणीसाठी इतके मनुष्यबळ वापरणे व्यवहार्य नाही. हेच मनुष्यबळ मोटार वाहन कायदे अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहेत. नाक्यामध्ये खासगीकरणातून झालेली गुंतवणूक कशी भागवायची यावर खल सुरू आहे. नाके बंद करण्यासाठी केंद्र शासनाने चारवेळा पत्रव्यवहार केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस