शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

मोठी बातमी; राज्यातील १३६ साखर कारखान्यांचे गाळप; सर्वाधिक कारखाने सोलापुरातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 14:40 IST

१३६ कारखान्यांचे गाळप सुरू: साखर हंगामाला अद्याप गती नाही

सोलापूर: राज्यातील साखर हंगामाला अद्यापही गती मिळाली नाही. एकूण १३६ कारखान्यांचे ९७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडे कोल्हापूर विभागात ३१ कारखाने सुरू असल्याचे दिसत असले तरी सर्वाधिक २३ कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यापैकी १७६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. सुरू झालेल्या १३६ कारखान्यांमध्ये कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. त्यानंतर सोलापूर(सोलापूर व उस्मानाबाद) व पुणे( पुणे व सातारा) विभागातील प्रत्येकी २४, अहमदनगर( अहमदनगर व नाशिक) विभागातील २३, औरंगाबाद (औरंगाबाद, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड) १९, नांदेड ( नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर) १३ तर अमरावती( बुलढाणा, अमरावती, यवतमाळ) विभागातील दोन साखर कारखाने सुरू झाले आहेत.

बुधवारपर्यंत राज्यातील १३६ कारखान्यांचे ९७ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून ७८ लाख मेट्रिक टन साखर तयार झाली आहे. ८.०७ टक्के इतका उतारा पडला आहे. साखर आयुक्तांच्या अहवालानुसार कोल्हापूर विभागात सर्वाधिक ३१ तर सोलापूर विभागात २४ कारखाने सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्षात एकट्या सोलापूर जिल्ह्यात २३ कारखाने सुरू झाले आहेत.

सोलापूर जिल्हा आघाडीवर..

एफआरपी थकविणाऱ्या, शासकीय देणी न देणाऱ्या इतर देणी थकविणाऱ्या २४ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्तांनी पेंडींग ठेवले आहेत. यामध्ये सोलापूर विभागातील १० तर सोलापूर जिल्ह्यातील ९ व उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे.

साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील २० व सोलापूर जिल्ह्यातील १६ कारखाने सुरू झाले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २३ साखर कारखाने सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील २३, कोल्हापूर २०, अहमदनगर १९, पुणे १५ तसेच सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी ११ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने