शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

मोठी बातमी; शासनाचे नियंत्रण नसल्याने आठ महिन्यांत बदलला ८ वेळा दूध खरेदीचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 15:58 IST

शासनाचे नियंत्रण नसलेल्या दुधाचे दर एक-दोन लोक ठरवितात

सोलापूर : शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या दूध खरेदी दरात मागील ८ महिन्यांत ८ वेळा दूध बदल झाला आहे. भाजीपाल्याप्रमाणेच दुधाचेही दर सातत्याने बदलत असल्याने दूध व्यवसायही बेभरवशाचा ठरू लागला आहे. विशेष म्हणजे शासनाचे कसलेच नियंत्रण राहिले नसल्याने दूध व्यवसाय खासगी व्यावसायिकांच्या ताब्यात गेला आहे.

शेती उत्पादनासाठीच्या खर्चात मोठी वाढ झाली, मात्र मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती आतबट्ट्याची ठरत आहे. यामुळेच शेतकरी दूध धंदा व्यवसाय म्हणून करीत आहेत. संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस जनावरांसाठी वैरण व संगोपनासाठी राबत असते. कासवाच्या वेगाने दूध दर वाढत असताना पशुखाद्याचे दर मात्र सशाच्या वेगाने वाढत आहेत. काही दिवस उलटले की दूध खरेदी दर कमी केले जातात, मात्र पशुखाद्याचे दर मात्र वाढतच राहतात.

यामुळे दूध उत्पादनातून शेतकरी सधन होताना दिसत नाहीत. जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत दूध खरेदी दरात ८ वेळा बदल झाला आहे. भाजीपाल्याचे दर जसे दररोज बदलतात तसेच दूध खरेदी दरातही बदल होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. देशात दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात सरकारचे नियंत्रण नसल्याने दूध व्यवसाय पूर्णपणे खासगी व्यक्तींच्या हातात गेला आहे. शेतकरी मात्र या खासगी डेअऱ्यांवर अवलंबून आहे.

२६ ते ३५ रुपये दर

सोलापूर जिल्ह्यात १ जानेवारी रोजी गाय दूध खरेदी दर प्रति लिटर २६ रुपये होता. फेब्रुवारी महिन्यात दर १० दिवसांनी दरवाढ होत १ मार्च रोजी तो २७ रुपये ५० पैसे झाला. १ मार्च रोजी प्रति लिटर ३३ तर ५ मेपासून ३५ रुपयांवर दर वाढला. १५ मे रोजी पुन्हा दर एक रुपयाने घसरून ३३ रुपयांवर आला होता. १ जुलै रोजी पुन्हा गुणप्रतीनुसार दरात बदल झाले. आता २१ ऑगस्टपासून दूध खरेदी दरात २ रुपयांनी वाढ होत ३५ रुपये दर झाला आहे. राज्यातही थोड्याफार फरकाने हेच दर आहेत.

------------

आता काही महिने दूध खरेदी दर स्थिर राहतील असे वाटते. राज्यभरातील दूध खरेदी दर सहा महिन्यांनी, वर्षभराने बदलण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. सध्या पावडर प्रकल्प मालक दूध खरेदी दर ठरवीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही व दूध ग्राहकांनाही योग्य दरात दूध मिळत नाही. अमुल दूध डेअरीचा दूध खरेदी दर जानेवारीपासून प्रति लिटर ३५ रुपयेच आहे.

- प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक कल्याणकारी संघ

आमची परवड कधी थांबणार: रणजितसिंह

दूध संकलन वाढवावे म्हटले तर खासगी दूध संघ स्पर्धा करुन आमचे गुणवत्तेचे दूध असतानाही अडचणीत आणतात. पॅकिंग फ्री पिशव्या देऊन वितरकांना भुरळ घालतात. दूध खरेदी दर खासगी प्रकल्प चालक ठरवितात. त्यामुळे सहकारी दूध संघ नियोजन करुन व्यवसाय करु शकत नाहीत. राज्य शासनाने पुढाकार घेतला तर शेतकरी जगेल असे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाGovernmentसरकार