शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

मोठी बातमी; सोलापुरातील ८० हजार अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 15:26 IST

पंचनामे पूर्ण, प्रस्ताव शासनाकडे सादरi: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती

सोलापूर : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार ४४० शेतकरी बाधित झाले असून, ६७ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल कर्मचारी, तसेच कृषी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, नुकसानभरपाईसाठी ६० कोटी १८ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

१५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात ५१७ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६१२ मिलिमीटर झाला. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७९ हजार ४२० शेतकऱ्यांचे ६७ हजार १९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उडीद, सोयाबीन व फळबागांचा समावेश आहे. शासन निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एकूण ६० कोटी १८ लाख १ हजार ९२५ रुपयांचा निधी सोलापूर जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी जिरायत शेतीसाठी ६ हजार ८०० रुपये, फळबागांसाठी १८ हजार रुपये आणि बागायत क्षेत्रांसाठी १३ हजार ५०० रुपये, अशी मदत शासनाकडून मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरासरी हेक्टरी १० ते २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

एका शेतकऱ्याचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, अनेक जनावरे दगावली आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळावी, तसेच यासह मृत जनावरांच्या नुकसानभरपाईसाठी एकूण ११ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार