शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मोठी बातमी; सोलापुरातील ८० हजार अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 15:26 IST

पंचनामे पूर्ण, प्रस्ताव शासनाकडे सादरi: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती

सोलापूर : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार ४४० शेतकरी बाधित झाले असून, ६७ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल कर्मचारी, तसेच कृषी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, नुकसानभरपाईसाठी ६० कोटी १८ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

१५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात ५१७ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६१२ मिलिमीटर झाला. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७९ हजार ४२० शेतकऱ्यांचे ६७ हजार १९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उडीद, सोयाबीन व फळबागांचा समावेश आहे. शासन निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एकूण ६० कोटी १८ लाख १ हजार ९२५ रुपयांचा निधी सोलापूर जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी जिरायत शेतीसाठी ६ हजार ८०० रुपये, फळबागांसाठी १८ हजार रुपये आणि बागायत क्षेत्रांसाठी १३ हजार ५०० रुपये, अशी मदत शासनाकडून मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरासरी हेक्टरी १० ते २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

एका शेतकऱ्याचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, अनेक जनावरे दगावली आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळावी, तसेच यासह मृत जनावरांच्या नुकसानभरपाईसाठी एकूण ११ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार