शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील भृगुकुलवंशीय मार्कंडेय महामुनींचा रथ सजतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:39 IST

चांदीचा वर्ख : ६५ वर्षांपासून याच वाहनातून निघते ‘श्रीं’ची मिरवणूक

ठळक मुद्देपद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव ‘श्रीं’चे वाहन असलेल्या रथाची सजावट सुरू६५ वर्षे जुन्या सागवानी लाकडाचा रथ सोनेरी, गडद तपकिरी या रंगांनी सजला

महेश कुलकर्णी सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना ‘श्रीं’चे वाहन असलेल्या रथाची सजावट सुरू आहे. ६५ वर्षे जुन्या सागवानी लाकडाचा रथ सोनेरी, गडद तपकिरी या रंगांनी सजला असून, उत्सवाच्या दिवशी आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

१९२४ साली मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली. स्थापनेनंतर २९ वर्षे नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवाची पालखी मिरवणूक निघत होती. १९५३ साली नरसय्या रामय्या बुर्ला यांनी ‘श्रीं’च्या उत्सवासाठी खास रथ आंध्र प्रदेशातून बनवून घेतला. सागवानी लाकडाचा रथ २० फूट लांबी, १५ फूट उंचीचा आहे. 

याचवेळी रथाला नरसय्या आकेन यांनी चांदीचा वर्ख करून दिला. या रथाच्या सारथ्याचा मान सुरुवातीपासून वर्षांपासून अंकाराम बंधूंचा आहे. रथ ओढण्यासाठी त्यांच्या घरातील बैलजोडी असते. नारळी पौर्णिमेच्या आधी महिनाभरापासून या बैलांना खुराक दिला जातो. कुठलेही काम लावण्यात येत नाही.

७.२ कि.मी. च्या मिरवणूक मार्गावर १४ तासांचा प्रवास हा रथ करतो. पुढे पालखी आणि मागे रथ. पालखीत चांदीचे शिवलिंग; रथात दीड फूट उंचीची मार्कंडेय महामुनींची सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती बसविली जाते. नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा रथ मंदिरात आणला जातो. रथाच्या पूजेचा मान सुदर्शन गुंडला परिवाराला आहे. त्यांनी पूजा केल्यानंतर रथ मिरवणुकीसाठी रवाना होतो.

  • ७.२ 

कि.मी. प्रवास

  • १४ 

तास मिरवणूक

  • २० 

फूट रुंदी

  • १५ 

फूट उंची

  • ०२ 

टन वजन

  • १०० किलोंचे दागिने

- मार्कंडेय मंदिरात मूळ मूर्तीला १०० किलोंचे सोन्याचे दागिने आहेत. वर्षात एक दिवस म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे दागिने मूर्तीला परिधान करण्यात येतात. 

मिरवणुकीत विणलेली वस्त्रे ‘श्रीं’स अर्पण- नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजता निघणारा रथोत्सव रात्री १२ वाजेपर्यंत चालतो. यादरम्यान मिरवणुकीत शिवलिंग आरकाल आणि त्यांचे कुटुंबीय वस्त्रे विणतात. ही वस्त्रे रथातील उत्सवमूर्तीला अर्पण करून रथोत्सवाचा समारोप करण्यात येतो.

शहरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मार्कंडेय रथोत्सवासाठी रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने मंडळांनी शांततेत रात्री दहाच्या आत मिरवणूक संपवावी.- सुरेश फलमारीसरचिटणीस, पद्मशाली ज्ञाती संस्था

टॅग्स :SolapurसोलापूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशTamilnaduतामिळनाडू