शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

सोलापूरातील भृगुकुलवंशीय मार्कंडेय महामुनींचा रथ सजतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:39 IST

चांदीचा वर्ख : ६५ वर्षांपासून याच वाहनातून निघते ‘श्रीं’ची मिरवणूक

ठळक मुद्देपद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव ‘श्रीं’चे वाहन असलेल्या रथाची सजावट सुरू६५ वर्षे जुन्या सागवानी लाकडाचा रथ सोनेरी, गडद तपकिरी या रंगांनी सजला

महेश कुलकर्णी सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना ‘श्रीं’चे वाहन असलेल्या रथाची सजावट सुरू आहे. ६५ वर्षे जुन्या सागवानी लाकडाचा रथ सोनेरी, गडद तपकिरी या रंगांनी सजला असून, उत्सवाच्या दिवशी आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

१९२४ साली मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली. स्थापनेनंतर २९ वर्षे नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवाची पालखी मिरवणूक निघत होती. १९५३ साली नरसय्या रामय्या बुर्ला यांनी ‘श्रीं’च्या उत्सवासाठी खास रथ आंध्र प्रदेशातून बनवून घेतला. सागवानी लाकडाचा रथ २० फूट लांबी, १५ फूट उंचीचा आहे. 

याचवेळी रथाला नरसय्या आकेन यांनी चांदीचा वर्ख करून दिला. या रथाच्या सारथ्याचा मान सुरुवातीपासून वर्षांपासून अंकाराम बंधूंचा आहे. रथ ओढण्यासाठी त्यांच्या घरातील बैलजोडी असते. नारळी पौर्णिमेच्या आधी महिनाभरापासून या बैलांना खुराक दिला जातो. कुठलेही काम लावण्यात येत नाही.

७.२ कि.मी. च्या मिरवणूक मार्गावर १४ तासांचा प्रवास हा रथ करतो. पुढे पालखी आणि मागे रथ. पालखीत चांदीचे शिवलिंग; रथात दीड फूट उंचीची मार्कंडेय महामुनींची सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती बसविली जाते. नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा रथ मंदिरात आणला जातो. रथाच्या पूजेचा मान सुदर्शन गुंडला परिवाराला आहे. त्यांनी पूजा केल्यानंतर रथ मिरवणुकीसाठी रवाना होतो.

  • ७.२ 

कि.मी. प्रवास

  • १४ 

तास मिरवणूक

  • २० 

फूट रुंदी

  • १५ 

फूट उंची

  • ०२ 

टन वजन

  • १०० किलोंचे दागिने

- मार्कंडेय मंदिरात मूळ मूर्तीला १०० किलोंचे सोन्याचे दागिने आहेत. वर्षात एक दिवस म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे दागिने मूर्तीला परिधान करण्यात येतात. 

मिरवणुकीत विणलेली वस्त्रे ‘श्रीं’स अर्पण- नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजता निघणारा रथोत्सव रात्री १२ वाजेपर्यंत चालतो. यादरम्यान मिरवणुकीत शिवलिंग आरकाल आणि त्यांचे कुटुंबीय वस्त्रे विणतात. ही वस्त्रे रथातील उत्सवमूर्तीला अर्पण करून रथोत्सवाचा समारोप करण्यात येतो.

शहरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मार्कंडेय रथोत्सवासाठी रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने मंडळांनी शांततेत रात्री दहाच्या आत मिरवणूक संपवावी.- सुरेश फलमारीसरचिटणीस, पद्मशाली ज्ञाती संस्था

टॅग्स :SolapurसोलापूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशTamilnaduतामिळनाडू