शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापुरात दिले होते धर्मांतराचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 16:12 IST

पंचाच्या चावडीला ऐतिहासिक महत्त्व : वतनदार परिषदेला झाली ९३ वर्षे

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुधवार पेठेतील पंचाची चावडी येथे पार पडलेल्या ऐतिहासिक वतनदार महार परिषदेला ९३ वर्षे पूर्ण झाली असून, दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी झालेल्या या परिषदेच्या ठरावामध्ये धर्मांतराबाबत संकेत देण्यात आले होते.

परिषदेत पाच हजारांहून अधिक लोक सहभागी होते. दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून लोकांनी येण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या परिवारातील सदस्यांसह मंडपात आले. लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचे स्वागत केले होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष जीवाप्पा काळे यांनी कामकाजाला सुरुवात केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अस्पृशोन्नतीचा आर्थिक पाया’ याबाबत आपले विचार प्रकट केले. ज्या दिवशी अस्पृश्यांची उपजीविका स्वतंत्र होईल व ते स्वतःच्या मानवी हक्कासाठी स्वतःचे जीवितही वेचण्यासाठी तयार होतील, तो दिवस अस्पृश्यांचाच काय पण हिंदू व हिंदुस्तान यांच्या दृष्टीने काही वेगळाच असेल, यात शंका नाही. जर आपणाला माणुसकी मिळवायची असेल तर त्यांनीही रयतेच्या गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे, जर त्यांना मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी निश्चिय केला पाहिजे. त्याशिवाय त्यांचा मार्ग सुकर होणार नाही, असे मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणात केले.

 

दुसऱ्या दिवशीच्या परिषदेत मांडले आठ ठराव

- सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेला सुरुवात झाली. यामध्ये एकूण आठ ठराव मंजूर झाले. यातील एक ठराव असा होता की, चातुर्वर्ण्याच्या चौकटीत सापडून चिरडून गेलेल्या अस्पृश्य वर्गाला आपली सुटका करून घेण्यासाठी धर्मांतर करावे की काय, याचा विचार करावा लागेल, असा ठराव मांडून धर्मांतराचे संकेत परिषदेमध्ये देण्यात आले होते.

हे होते परिषदेचे कार्यकारिणी सदस्य...

- विश्वनाथ बनसोडे, मुकिंदा बाबरे, निवृत्ती बनसोडे, रामा सरवदे, पापा तळभंडारे, विठ्ठल सरवदे, भिकाजी तळभांडरे, तुकाराम बाबरे, बळी तळमोहिते, उद्धव शिवशरण, हरिभाऊ तोरणे हे परिषदेचे कार्यकारी सदस्य होते.

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती