शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापुरात दिले होते धर्मांतराचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 16:12 IST

पंचाच्या चावडीला ऐतिहासिक महत्त्व : वतनदार परिषदेला झाली ९३ वर्षे

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुधवार पेठेतील पंचाची चावडी येथे पार पडलेल्या ऐतिहासिक वतनदार महार परिषदेला ९३ वर्षे पूर्ण झाली असून, दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी झालेल्या या परिषदेच्या ठरावामध्ये धर्मांतराबाबत संकेत देण्यात आले होते.

परिषदेत पाच हजारांहून अधिक लोक सहभागी होते. दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून लोकांनी येण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या परिवारातील सदस्यांसह मंडपात आले. लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचे स्वागत केले होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष जीवाप्पा काळे यांनी कामकाजाला सुरुवात केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अस्पृशोन्नतीचा आर्थिक पाया’ याबाबत आपले विचार प्रकट केले. ज्या दिवशी अस्पृश्यांची उपजीविका स्वतंत्र होईल व ते स्वतःच्या मानवी हक्कासाठी स्वतःचे जीवितही वेचण्यासाठी तयार होतील, तो दिवस अस्पृश्यांचाच काय पण हिंदू व हिंदुस्तान यांच्या दृष्टीने काही वेगळाच असेल, यात शंका नाही. जर आपणाला माणुसकी मिळवायची असेल तर त्यांनीही रयतेच्या गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे, जर त्यांना मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी निश्चिय केला पाहिजे. त्याशिवाय त्यांचा मार्ग सुकर होणार नाही, असे मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणात केले.

 

दुसऱ्या दिवशीच्या परिषदेत मांडले आठ ठराव

- सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेला सुरुवात झाली. यामध्ये एकूण आठ ठराव मंजूर झाले. यातील एक ठराव असा होता की, चातुर्वर्ण्याच्या चौकटीत सापडून चिरडून गेलेल्या अस्पृश्य वर्गाला आपली सुटका करून घेण्यासाठी धर्मांतर करावे की काय, याचा विचार करावा लागेल, असा ठराव मांडून धर्मांतराचे संकेत परिषदेमध्ये देण्यात आले होते.

हे होते परिषदेचे कार्यकारिणी सदस्य...

- विश्वनाथ बनसोडे, मुकिंदा बाबरे, निवृत्ती बनसोडे, रामा सरवदे, पापा तळभंडारे, विठ्ठल सरवदे, भिकाजी तळभांडरे, तुकाराम बाबरे, बळी तळमोहिते, उद्धव शिवशरण, हरिभाऊ तोरणे हे परिषदेचे कार्यकारी सदस्य होते.

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती