शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सोलापूरकरांनो सावधान; सोलापूर शहराच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण चिंताजनक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:21 IST

दिवसा आणि रात्रीच्या प्रदूषणात देखील सोलापूर प्रथम

सोलापूर : कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच दिवाळी उत्साहात झाली. या दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फुटले आणि फटाक्यांचा आवाज ही मोठाच होता. अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषणाला आपण गंभीरतेने घेत नाही, प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक नियमावलींकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र हे प्रदूषण अदृश्य असून जीवघेणे आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०२१ चा अहवालानुसार महाराष्ट्रातील शहरात ध्वनी प्रदूषणात वाढ चिंताजनक आहे. ध्वनीचे प्रमाण हे ७० डेसिबलच्या पुढे गेल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. शहराच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या प्रदूषणात वाढ झाली असून हे प्रमाण दिवसा सर्वाधिक ७८.४ - रात्री सर्वाधिक ७१.७ डेसिबल पर्यंत गेल्याचे या अहवालात आढळून आले. याशिवाय दिवसा आणि रात्रीच्या प्रदूषणात देखील सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने असाच ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास २२ व २३ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आला होता, तेव्हा सुद्धा थोड्याफार फरकाने या सर्व शहरात ध्वनी प्रदूषण वाढलेले आढळले. गेल्या दहा वर्षांपासून मंडळ ध्वनी प्रदूषणाच्या नोंदी घेत आहेत. ध्वनी प्रदूषणाची ही निरीक्षणे प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे २१-२२ फेब्रुवारी २०२१ ला सुद्धा २७ शहरातील १०२ ठिकाणी घेण्यात आली. यात बहुतेक शहरात दिवसा आणि रात्री ध्वनी प्रदूषण सुरक्षित मानकापेक्षा व मर्यादेपेक्षा अधिक आढळले.

---

सोलापूरकरांसाठी ही धोक्याची घंटा

रंगभवन, महापालिका, ओरोनोका पूल, जुळे सोलापूर पाण्याची टाकी, नवे नियोजन भवन या ठिकाणाहून हवा प्रदूषणाचे मोजमाप घेतली जातात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दैनंदिन घेण्यात आलेल्या चाचणीनुसार शहरातील हवा धाेक्याची पातळी ओलांडलेली आहे. शहरातील धुळीचे प्रमाण, झाडांची घटती संख्या व वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे.

---

शहरातील हवा किती शुद्ध

शहरातील हवा प्रदूषणाचे प्रमाण ८० मिलीग्रॅमपर्यंत असून १५० पर्यंत ते धोक्याचे असते. सोलापूर शहरातील ११ नोव्हेंबर हवा प्रदूषणाचे प्रमाण १८६

  • ५ नोव्हेंबर १०१
  • ६ नोव्हेंबर ७५
  • ७ नोव्हेंबर ५६
  • ८ नोव्हेंबर ८९
  • ९ नोव्हेंबर ५७
  • १० नोव्हेंबर १०९
  • ११ नोव्हेंबर १८६

----

ध्वनी प्रदूषणामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होतात. यामध्ये बहिरेपणा, निद्रानाश, अस्वस्थता, डोकेदुखी, चिडचिडेपणा अशा आजारात वाढ होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. -डॉ. जलील जहागीरदार, कान नाक घसा तज्ज्ञ  वायू प्रदूषणांमुळे दमा, अस्थमा, त्वचारोग, सर्दी, श्वसनविकार असे आजार वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, चिडचिडेपणा असे आजार उदभवू शकतात यामुळे बाहेर पडताना कान नाकाची काळजी घेणं गरजेचे आहे.

-डॉ. प्रसाद कोरुलकर,

 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणSmart Cityस्मार्ट सिटीpollutionप्रदूषण