शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:39 IST

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. ...

ठळक मुद्दे०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरीकृषी गणना कार्यालयामध्ये आकडेवारीसाठी धांदल सुरूप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेतकºयाच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी २०१५-१६ च्या कृषी गणनेची आकडेवारी अंतिम करण्याची धांदल सुरू आहे.

केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकºयांना दर महिन्याला पाचशे रुपये देण्याची तरतूद केली आहे. अल्पभूधारक व्याख्येनुसार पाच एकरापर्यंतचे क्षेत्र असलेला शेतकरी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी पात्र राहणार आहे. याबाबत सविस्तर आदेश आला नसला तरी एक हेक्टरपर्यंत, दोन हेक्टरपर्यंत व दोन हेक्टर क्षेत्रावरील शेतकºयांचा आकडा अंतिम करण्याचे काम सध्या पुणे येथे कृषी गणना कार्यालयात सुरू आहे.

दर पाच वर्षांनंतर राज्यातील कृषी गणना केली जाते. २०१०-११ मध्ये केलेल्या कृषी गणनेत सोलापूर जिल्ह्यात एकूण ६ लाख ६७ हजार ९१० खातेदार होते. यामध्ये एक हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख ३६ हजार ८१९, दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख १२ हजार ८३० तर दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकºयांची संख्या दोन लाख १८ हजार २६१ इतकी होती.

आता नव्याने २०१५-१६ या वर्षी कृषी गणना झाली असून त्याची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली नाही. केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केल्याने पुणे येथील कृषी गणना कार्यालयात क्षेत्राची आकडेमोड करण्याची धांदल सुरू आहे. दोन-तीन दिवसात आकडेवारी अंतिम होईल असे सांगण्यात आले.

अधिक माहिती विचारली असता अल्पभूधारक शेतकºयांची संख्या ५ लाख २० हजारांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले; मात्र शासन आदेशातील नियमावलीनुसार (बागायती- जिरायती) शेतकरी संख्या निश्चित होणार आहे. कृषी सन्मान योजनेमध्ये आपला समावेश व्हावा यासाठी अनेक शेतकºयांनी आॅनलाईन केंद्रावर विचारणा केली होती. दरम्यानच्या काळात नेटवर्कमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. 

२०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरी आहेत. यामध्ये मागील पाच वर्षांत अल्पभूधारक शेतकºयांची संख्या साधारण ११ टक्क्याने वाढली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.- बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाBudget 2019अर्थसंकल्प 2019