शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:39 IST

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. ...

ठळक मुद्दे०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरीकृषी गणना कार्यालयामध्ये आकडेवारीसाठी धांदल सुरूप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेतकºयाच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी २०१५-१६ च्या कृषी गणनेची आकडेवारी अंतिम करण्याची धांदल सुरू आहे.

केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकºयांना दर महिन्याला पाचशे रुपये देण्याची तरतूद केली आहे. अल्पभूधारक व्याख्येनुसार पाच एकरापर्यंतचे क्षेत्र असलेला शेतकरी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी पात्र राहणार आहे. याबाबत सविस्तर आदेश आला नसला तरी एक हेक्टरपर्यंत, दोन हेक्टरपर्यंत व दोन हेक्टर क्षेत्रावरील शेतकºयांचा आकडा अंतिम करण्याचे काम सध्या पुणे येथे कृषी गणना कार्यालयात सुरू आहे.

दर पाच वर्षांनंतर राज्यातील कृषी गणना केली जाते. २०१०-११ मध्ये केलेल्या कृषी गणनेत सोलापूर जिल्ह्यात एकूण ६ लाख ६७ हजार ९१० खातेदार होते. यामध्ये एक हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख ३६ हजार ८१९, दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख १२ हजार ८३० तर दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकºयांची संख्या दोन लाख १८ हजार २६१ इतकी होती.

आता नव्याने २०१५-१६ या वर्षी कृषी गणना झाली असून त्याची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली नाही. केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केल्याने पुणे येथील कृषी गणना कार्यालयात क्षेत्राची आकडेमोड करण्याची धांदल सुरू आहे. दोन-तीन दिवसात आकडेवारी अंतिम होईल असे सांगण्यात आले.

अधिक माहिती विचारली असता अल्पभूधारक शेतकºयांची संख्या ५ लाख २० हजारांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले; मात्र शासन आदेशातील नियमावलीनुसार (बागायती- जिरायती) शेतकरी संख्या निश्चित होणार आहे. कृषी सन्मान योजनेमध्ये आपला समावेश व्हावा यासाठी अनेक शेतकºयांनी आॅनलाईन केंद्रावर विचारणा केली होती. दरम्यानच्या काळात नेटवर्कमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. 

२०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरी आहेत. यामध्ये मागील पाच वर्षांत अल्पभूधारक शेतकºयांची संख्या साधारण ११ टक्क्याने वाढली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.- बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाBudget 2019अर्थसंकल्प 2019