शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:39 IST

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. ...

ठळक मुद्दे०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरीकृषी गणना कार्यालयामध्ये आकडेवारीसाठी धांदल सुरूप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेतकºयाच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी २०१५-१६ च्या कृषी गणनेची आकडेवारी अंतिम करण्याची धांदल सुरू आहे.

केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकºयांना दर महिन्याला पाचशे रुपये देण्याची तरतूद केली आहे. अल्पभूधारक व्याख्येनुसार पाच एकरापर्यंतचे क्षेत्र असलेला शेतकरी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी पात्र राहणार आहे. याबाबत सविस्तर आदेश आला नसला तरी एक हेक्टरपर्यंत, दोन हेक्टरपर्यंत व दोन हेक्टर क्षेत्रावरील शेतकºयांचा आकडा अंतिम करण्याचे काम सध्या पुणे येथे कृषी गणना कार्यालयात सुरू आहे.

दर पाच वर्षांनंतर राज्यातील कृषी गणना केली जाते. २०१०-११ मध्ये केलेल्या कृषी गणनेत सोलापूर जिल्ह्यात एकूण ६ लाख ६७ हजार ९१० खातेदार होते. यामध्ये एक हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख ३६ हजार ८१९, दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले दोन लाख १२ हजार ८३० तर दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकºयांची संख्या दोन लाख १८ हजार २६१ इतकी होती.

आता नव्याने २०१५-१६ या वर्षी कृषी गणना झाली असून त्याची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली नाही. केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केल्याने पुणे येथील कृषी गणना कार्यालयात क्षेत्राची आकडेमोड करण्याची धांदल सुरू आहे. दोन-तीन दिवसात आकडेवारी अंतिम होईल असे सांगण्यात आले.

अधिक माहिती विचारली असता अल्पभूधारक शेतकºयांची संख्या ५ लाख २० हजारांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले; मात्र शासन आदेशातील नियमावलीनुसार (बागायती- जिरायती) शेतकरी संख्या निश्चित होणार आहे. कृषी सन्मान योजनेमध्ये आपला समावेश व्हावा यासाठी अनेक शेतकºयांनी आॅनलाईन केंद्रावर विचारणा केली होती. दरम्यानच्या काळात नेटवर्कमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. 

२०१०-११ च्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६४९ अल्पभूधारक शेतकरी आहेत. यामध्ये मागील पाच वर्षांत अल्पभूधारक शेतकºयांची संख्या साधारण ११ टक्क्याने वाढली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आदेश आल्यानंतर शेतकरी संख्या अंतिम होईल.- बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाBudget 2019अर्थसंकल्प 2019