शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आठ ते दहा हजारांमध्ये घुसवतात बांगलादेशी ! स्थानिकांच्या मदतीने आधारकार्ड मिळवतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:46 IST

हालाखीची परिस्थिती असलेल्या बांगलादेशातून काम करून जगण्यासाठी ऐपतीप्रमाणे ८ ते १० हजार किंवा त्याही पेक्षा जास्त पैसे देऊन भारतात प्रवेश मिळवतात.

सोलापूर : हालाखीची परिस्थिती असलेल्या बांगलादेशातून काम करून जगण्यासाठी ऐपतीप्रमाणे ८ ते १० हजार किंवा त्याही पेक्षा जास्त पैसे देऊन भारतात प्रवेश मिळवतात. तेथून ते एखाद्या कारखान्यात कामासाठी वास्तव्य करतात, तेथेच स्थानिक लोकांच्या मदतीने स्वतःचे आधारकार्ड तयार करून घेतात अन् देशात फिरण्याचा कायमचा परवाना मिळवतात, अशी माहिती तपासात पुढे येत आहे.बांगलादेशातील काही लोकांना पैसे देऊन देशाच्या सीमेवरून भारतात आणले जाते. तेथून त्यांना एका ठिकाणी कामाला लावले जाते. थोडा कालावधी गेल्यानंतर ते देशभरात कामाच्या शोधात निघतात. यांना काम मिळवून देणारा एक ठेकेदार असतो, त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. जिथे कामरागाची गरज असते, तिथे त्यांना बोलावले जाते. कोणत्याही परिस्थितीमध्ये राहून काम करण्याची त्यांची तयारी असते. कमी पगारामध्ये कामगार मिळतो, म्हणून त्यांना लगेच कामावर ठेवले जाते. सोलापुरात बांगलादेशींनी प्रवेश केला. एका पाठोपाठ एक आलेल्या या बांगलादेशी तरुणांना एका हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. १२ पैकी ५ जण १५ दिवसांपूर्वी सोलापुरात आले होते. काही कामगार २ ते ४ महिन्यांपासून काम करीत होते, तर एकजण ८ महिन्यांपासून काम करीत होता. ठेकेदारासह अन्य एकाला अटक केल्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या १४ झाली आहे.

सहा महिन्यांची शिक्षा; पुन्हा बांगलादेशात रवानगी

घुसखोरांना अटक केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी मिळते. चौकशीनंतर न्यायालयीन कोठडी दिली जाते. खटला चालवला जातो. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर संबंधित घुसखोरांना सहा महिन्यांची शिक्षा होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात सोडण्यात येते, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPoliceपोलिस