शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

बांबूला हवाय लोकाश्रय अन् राजाश्रय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:22 AM

काळाची आवश्यकता ओळखून शासनाने पावले टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आहे. आताची वाटचाल चांगली व समाधानकारक आहे,बरेच शेतकरी पारंपरिक ...

काळाची आवश्यकता ओळखून शासनाने पावले टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आहे. आताची वाटचाल चांगली व समाधानकारक आहे,बरेच शेतकरी पारंपरिक पिकांना थोडासा फाटा देऊन बांबूशेतीकडे वळले-वळत आहेत, दुसरीकडे बांबूच्या वस्तू महागड्या असल्या तरी त्याकडे सध्या श्रीमंत लोकांचे आकर्षण वाढत आहे. मोठ-मोठी कार्यालये, बंगले, फॉर्महाऊस व हॉटेल्सच्या रुबाबात भर घालून बांबूच्या वस्तूंनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे मागासवर्गीय संवर्गातील जातीतील एका कुटुंबास पाच एकर जमीन मोफत देणार आहे, त्यासाठी महात्मा फुले महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दादासाहेब गायकवाड योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवड करता येऊ शकते. एवढेच नव्हे तर सरकारने १९७२ च्या वन कायद्यातून अत्यंत जाचक अटी व तरतुदी रद्द करून बांबूला जंगल (वन) मुक्त केले. बांबूला लाकडाऐवजी गवताचा दर्जा दिला, त्यामुळे अनेक वर्षांचा अडथळा दूर होऊन विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.

जगाच्या एकूण बांबू लागवड क्षेत्रापैकी १९ टक्के क्षेत्र भारतात आहे त्यापैकी फक्त ६ क्षेत्रावर बांबू उत्पादन घेतले जात असले तरी भारत अग्रक्रमावर आहे, तर बांबू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीन हा देश लाकडाला पर्याय म्हणून ७० टक्के बांबूचा वापर करीत आहे. त्यामुळे भारतात तेथून बांबूच्या काही वस्तू आयात कराव्या लागतात.

एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास भारताला दरवर्षी २ लाख ३० मेट्रिक टन उदबत्ती लागते त्यापैकी १ लाख ७० मेट्रिक टन उदबत्ती चीनहून आयात करावी लागते. म्हणजे तेवढा पैसा बाहेर जातो. जगात बांबूच्या १५०० जाती आहेत,त्यातील १००-१५० जातीचे बांबू पीक घेण्याचा प्रयत्न भारतात केला जात आहे, त्यासाठी कृषी खात्याच्या अंतर्गत राष्ट्रीय बांबू मिशन व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी वन खात्यावर सोपविली आहे. अनेक तरुणांना विशेषतः बांबूवर जीवन जगणाऱ्या बुरुड समाजास होत आहे. आज बेरोजगार तरुण, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बांबुशेती व बांबुउद्योग हा एक आशेचा किरण बनला आहे, हे मात्र खरे आहे.

- दशरथ वडतिले (लेखक सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष आहे.)