शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जितके लीड, तितकी झाडे..पर्यावरणाला बळ वाढे; सांगोल्याच्या आमदारांचा अनोखा उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:27 IST

संकल्पाची राज्यभर चर्चा

सांगोला/कोल्हापूर : निवडणुका जिंकल्या की गुलाल, फटाके फोडून आनंद साजरा करणारे कमी नाहीत. पण, आपला विजय जनतेच्या हितासाठी सार्थकी लागावा यासाठी सांगोला (जि. सोलापूर) येथील शेतकरी कामगार पक्षाचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ज्या गावांमध्ये जितके मताधिक्य आहे, त्या गावात तितकी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. डॉ. देशमुख यांचा हा आदर्शवत संकल्प पर्यावरणासाठी बळ देणारा ठरणार असून, इतर उमेदवारांच्या डोळ्यातही अंजन घालणारा आहे. 

विशेष म्हणजे आयुष्यभर साधी राहणी जपत निष्कलंक राजकारणी कसा असावा, याचा दाखला देणाऱ्या माजी मंत्री स्व. गणपतराव देशमुख यांचे डॉ. बाबासाहेब हे नातू आहेत. पर्यावरणाला बळ देऊन आजाेबांच्या सामाजिक दातृत्वाचे एक पान नातवानेही अधिक समृद्ध केले आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पाची राज्यभर चर्चा सुरू आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे २५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. ‘काय झाडी, काय डोंगर’, या डायलॉगमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. पेशाने कार्डिओलॉजिस्ट (एमडी) असलेल्या व पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या डॉ. देशमुख यांनी अंगावरचा गुलाल खाली उतरण्याआधीच ज्या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मताधिक्य असेल तितकी झाडे (वृक्ष) त्या गावात लावण्याचा संकल्प सोडला. त्यांचा हा संकल्प अवर्षणग्रस्त सांगोला तालुक्याला पर्यावरणदृष्ट्या समृद्ध करणारा ठरणार आहे. डॉ. देशमुख यांना शहाजीबापू यांच्यापेक्षा २५ हजार ३८६ मते अधिक मिळाली असून, त्यांच्या संकल्पनेनुसार २५ हजार वृक्षांची लागवड तालुक्यात केली जाणार आहे.

झाडी गुवाहटीला नव्हे, सांगोल्यात बघानिवडणुकीत अंगाला गुलाल लागला की, लोकप्रतिनिधी जमिनीवर येतच नाहीत. जंगी मिरवणुका, सत्कार सोहळे यातच जे जास्त रममान होतात. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मात्र या सगळ्यांना फाटा देत वृक्षलागवडीचा केलेला संकल्प राज्यभर चर्चेत आहे. सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर डॉ. देशमुख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुवाहटीच्या डोंगर, झाडांची भुरळ पडलेल्या शहाजीबापूंनी आता डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात तयार होणारी झाडी बघावी, अशाही मिश्कील प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत.

राजकारण, निवडणुका या तात्पुरत्या असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधीने समाजहितालाच पहिले प्राधान्य द्यायला हवे. निसर्गाला अधिक समृद्ध करायचे असेल, तर झाडांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पर्यावरणाला बळ देण्यासाठी मी तालुकाभर वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला आहे. त्याचे नियोजन सुरू झाले आहे. - डॉ. बाबासाहेब देशमुख, नूतन आमदार, सांगोला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangole-acसांगोला