शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

बाप रे...अवकाळी पावसामुळे कडब्याच्या भावात अडीच हजाराने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 15:07 IST

अवकाळीचा फटका: वैरणीला वाढली मागणी

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे यंदा ज्वारीची केवळ ६५ क्षेत्रावर म्हणजे २ लाख २७ हजार ३५५ हेक्टरावर पेरणी ज्वारी व चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाल्याने मागणी वाढलीहरभऱ्याच्या मळणीसाठी ट्रॅक्टरवरील मशीनचा वापर झाल्याने काड्याचा भुगा होत आहे

सोलापूर: ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्द्ध असलेल्या जिल्ह्यात कडब्याच्या भावात गेल्या तीन दिवसात अडीच हजाराने वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका व चाऱ्याला मागणी वाढल्याने हा बदल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबला. शेतात बराच काळ पाणी साचून राहिल्याने ज्वारीचे पेरणीक्षेत्र घटले. त्यामुळे पर्यायाने गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढले. फेब्रुवारीअखेर रब्बी सुगी तेजीत होती. अशात दोनवेळा ढगाळी हवामान निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी घाईने हंगाम आटोपता घेतला आहे. सुगीसाठी यंदा यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. गहू, हरभरा, करडई काढणीसाठी हार्वेस्टरचा मोठया प्रमाणावर वापर केल्याने अवकाळीने नुकसान टाळता आले आहे. पण ज्वारी काढणीसाठी मजुराचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे ज्वारी असलेल्या अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, माढा शिवारात लगबग दिसून आली.

गहू व हरभरा शेतकऱ्यांना चांगला पिकला आहे, पण ज्वारीला म्हणावा तसा उतारा मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ज्वारीचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्वारीचे उत्पन्न जसे कमी आले तसे कडबाही कमीच आहे. पण चाऱ्यासाठी कडब्याला मोठी मागणी वाढली आहे. सुका चारा म्हणून दुभती जनावरे व बैलांना पावसाळ्यात कडब्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडब्याची साठवणूक सुरू केली आहे. कडब्याची मागणी वाढल्याने दक्षिण सोलापूर, मोहोळ व मंगळवेढा शिवारात व्यापारी फिरत आहेत. फेब्रुवारी दहा हजाराला एक हजार पेंढी कडब्याला भाव होता. गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसाने हा भाव आता साडेबारा हजारावर गेल्याचे कडब्याचे व्यापारी नबीलाल शेख यांनी सांगितले.

६५ टक्केच पेरणी

अतिवृष्टीमुळे यंदा ज्वारीची केवळ ६५ क्षेत्रावर म्हणजे २ लाख २७ हजार ३५५ हेक्टरावर पेरणी झाली. यातील चांगले पीक येण्याचे क्षेत्र सुमारे २७ हजार हेक्टरांनी कमी झाले. त्यामुळे ज्वारी व चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाल्याने मागणी वाढली आहे. याशिवार हरभऱ्याच्या मळणीसाठी ट्रॅक्टरवरील मशीनचा वापर झाल्याने काड्याचा भुगा होत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभऱ्याच्या काड्यांना (भुसा) चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी