शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

बाप रे...अवकाळी पावसामुळे कडब्याच्या भावात अडीच हजाराने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 15:07 IST

अवकाळीचा फटका: वैरणीला वाढली मागणी

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे यंदा ज्वारीची केवळ ६५ क्षेत्रावर म्हणजे २ लाख २७ हजार ३५५ हेक्टरावर पेरणी ज्वारी व चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाल्याने मागणी वाढलीहरभऱ्याच्या मळणीसाठी ट्रॅक्टरवरील मशीनचा वापर झाल्याने काड्याचा भुगा होत आहे

सोलापूर: ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्द्ध असलेल्या जिल्ह्यात कडब्याच्या भावात गेल्या तीन दिवसात अडीच हजाराने वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका व चाऱ्याला मागणी वाढल्याने हा बदल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबला. शेतात बराच काळ पाणी साचून राहिल्याने ज्वारीचे पेरणीक्षेत्र घटले. त्यामुळे पर्यायाने गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढले. फेब्रुवारीअखेर रब्बी सुगी तेजीत होती. अशात दोनवेळा ढगाळी हवामान निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी घाईने हंगाम आटोपता घेतला आहे. सुगीसाठी यंदा यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. गहू, हरभरा, करडई काढणीसाठी हार्वेस्टरचा मोठया प्रमाणावर वापर केल्याने अवकाळीने नुकसान टाळता आले आहे. पण ज्वारी काढणीसाठी मजुराचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे ज्वारी असलेल्या अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, माढा शिवारात लगबग दिसून आली.

गहू व हरभरा शेतकऱ्यांना चांगला पिकला आहे, पण ज्वारीला म्हणावा तसा उतारा मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ज्वारीचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्वारीचे उत्पन्न जसे कमी आले तसे कडबाही कमीच आहे. पण चाऱ्यासाठी कडब्याला मोठी मागणी वाढली आहे. सुका चारा म्हणून दुभती जनावरे व बैलांना पावसाळ्यात कडब्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडब्याची साठवणूक सुरू केली आहे. कडब्याची मागणी वाढल्याने दक्षिण सोलापूर, मोहोळ व मंगळवेढा शिवारात व्यापारी फिरत आहेत. फेब्रुवारी दहा हजाराला एक हजार पेंढी कडब्याला भाव होता. गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसाने हा भाव आता साडेबारा हजारावर गेल्याचे कडब्याचे व्यापारी नबीलाल शेख यांनी सांगितले.

६५ टक्केच पेरणी

अतिवृष्टीमुळे यंदा ज्वारीची केवळ ६५ क्षेत्रावर म्हणजे २ लाख २७ हजार ३५५ हेक्टरावर पेरणी झाली. यातील चांगले पीक येण्याचे क्षेत्र सुमारे २७ हजार हेक्टरांनी कमी झाले. त्यामुळे ज्वारी व चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाल्याने मागणी वाढली आहे. याशिवार हरभऱ्याच्या मळणीसाठी ट्रॅक्टरवरील मशीनचा वापर झाल्याने काड्याचा भुगा होत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभऱ्याच्या काड्यांना (भुसा) चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी