शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे लक्ष द्यावे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांचे मत, सोलापूर विद्यापीठात झाले व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:38 PM

सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात ‘समाजाचे प्रश्न आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये : पद्मभूषण देशपांडेबदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली : पद्मभूषण देशपांडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात ‘समाजाचे प्रश्न आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मंचावर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ, दत्ता गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार होते. पुढे बोलताना देशपांडे म्हणाले की, आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये. बदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली आहे. यापुढच्या काळात टेलिव्हिजनचे युग संपून मोबाईलचे युग व्यापक होईल, त्यादृष्टीने भावी पत्रकारांनी तंत्रज्ञान कौशल्य मिळवायला हवे. दत्ता बाळसराफ म्हणाले की, एकेकाळी संगणक अनेकांना बेरोजगार करील या भीतीतून समाजाच्या सर्वच स्तरातून नवतंत्रज्ञानाला विरोध झाला. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले व संगणकाचा देशात प्रसार होण्यास उशीर झाला. यापुढे नवतंत्रज्ञानाला विरोध केला जाऊ नये. सजगपणे नवतंत्रज्ञान स्वीकारावे. कालबाह्य झालेले अभ्यासक्रम, पध्दती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. दत्ता गायकवाड म्हणाले की, जुने ते सर्व वाईट असे मानणे चूक ठरेल. तत्त्वज्ञानासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची आजही तेवढीच गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले. सदर कार्यक्रमास नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक नीलेश राऊत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, विजय काणेकर, डॉ. माया पाटील, प्रा. अंबादास भासके, प्रा. मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.-----------------जनतेला योग्य मार्गदर्शन करा : अशोककुमार- आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. याचे फायदे अनेक असले तरी तोटेही नाकारता येत नाहीत. माध्यमांमध्ये बदल होत आहे ही चांगली बाब असली तरी त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, तरच त्याचा चांगला हेतू साध्य होईल, असे मत यावेळी डॉ. इ. एन. अशोककुमार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलाताना व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर