शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अशीही जिद्द अन् चिकाटी; गावोगावी फिरून विकला ५ लाखांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:45 IST

२८ हजार ४०० किलोची भाजी : लॉकडाऊनमुळे मुंबईत माल पाठविणे होते बंद

ठळक मुद्देघरची केवळ ५ एकर शेतजमीन असून तीही पाण्याअभावी नापिक लॉकडाऊनपूर्वी प्रकाश आपला भाजीपाला खासगी वाहनातून मुंबईला पाठवित होता फळे व भाजीपाला गावठाण व वाड्या-वस्त्यांवर फिरून  विक्री

सांगोला : कोरोनाच्या ताळेबंदीत शेतीमाल व भाजीपाल्याची साखळी खंडित झाल्यानंतर डिकसळ (ता. सांगोला) येथील प्रकाश गायकवाड यांनी कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष केले. कोरोनाला न घाबरता शेतकºयाकडून भाजीपाला व फळे खरेदी करून ते आई, वडील, पत्नी व भाच्याच्या सहकार्याने लॉकडाऊनच्या काळात सुमारे २८ हजार ४०० किलो भाजीपाला व फळे विक्री करून ५ लाखांच्या व्यवसायातून हजारो रूपये कमविले आहेत. डिकसळ येथील प्रकाश गायकवाड हा तरूण मागील १० वर्षांपासून फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे. तसा प्रकाश शिवसेनेचा शाखाप्रमुख असून आ. शहाजीबापू पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. समाजकारण व राजकारणामध्ये दंग असलेला प्रकाश आज गावासह परिसरात भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी तितकाच प्रसिद्ध आहे.

घरची केवळ ५ एकर शेतजमीन असून तीही पाण्याअभावी नापिक आहे. पण थोड्याफार जमिनीमध्ये भाजीपाला व अन्य पिके घेऊन प्रकाश आपला संसाराचा गाडा चालवित आहे. घरी आई, वडील व पत्नीच्या सहकार्याने दूध व्यवसायाबरोबरच पहाटे ५ वाजल्यापासून परिसरातील गावांमधून भाजीपाला व फळे खरेदी करून परिसरातील लोकांसाठी घरपोच सेवा देत आहे.

लॉकडाऊनपूर्वी प्रकाश आपला भाजीपाला खासगी वाहनातून मुंबईला पाठवित होता, परंतु लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे प्रकाशने या कालावधीत शेतकºयांकडून दैनंदिन खरेदी केलेली फळे व भाजीपाला गावठाण व वाड्या-वस्त्यांवर फिरून  विक्री करीत आहे. त्याने फळे व भाजीपाला येळवी, पारे, घेरडी, लोहगाव, वायफळ, हंगिरगे आदी गावांमधील शेतकºयांकडून खरेदी केला व तोच माल नियोजन करून डिकसळ परिसरासह वाड्यावस्त्यांवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वाड्या वस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या भाजीपाला मिळू लागला आहे.

गावामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये तो सतत प्रकाशमयच असतो. त्याच्या भाजीपाला व्यवसायाला भाचा गणेश शिंदे मोलाची साथ देत असल्यामुळे मामा -भाच्याने मिळून लॉकडाऊनच्या काळात आत्तापर्यंत २८ हजार ४००  किलो फळे व भाजीपाला विक्री करून सुमारे ५ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.

अशी केली फळे व भाजीपाला विक्री - टोमॅटो २ हजार ४०० किलो, वांगी ४ हजार किलो,मिरची ६०० किलो,गवार ५ हजार किलो,कांदा ३ हजार किलो,दोडका १ हजार किलो, सिमला मिरची १ हजार किलो ,कारले १ हजार किलो,कोबी ३ हजार किलो इतर पाले भाजीपाला ३ हजार जोड्या तर फळे-चिक्कू ३ हजार किलो, पेरू १ हजार ५०० किलो, कलिंगडे १ हजार किलो असा माल विक्री केला.

मागील दहा वर्षांपासून फळे व भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असून लॉकडाऊनपूर्वी हा सर्व माल मुंबईला पाठवित होतो. परंतु लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाला गाव परिसर वाड्यावस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. आत्तापर्यंत ५ लाख ४ हजार रुपये मालाच्या विक्रीतून दरमहा १५ ते २० हजार रुपये इतका नफा मिळाला आहे.- प्रकाश गायकवाड, भाजीपाला विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळे