शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

अशीही जिद्द अन् चिकाटी; गावोगावी फिरून विकला ५ लाखांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:45 IST

२८ हजार ४०० किलोची भाजी : लॉकडाऊनमुळे मुंबईत माल पाठविणे होते बंद

ठळक मुद्देघरची केवळ ५ एकर शेतजमीन असून तीही पाण्याअभावी नापिक लॉकडाऊनपूर्वी प्रकाश आपला भाजीपाला खासगी वाहनातून मुंबईला पाठवित होता फळे व भाजीपाला गावठाण व वाड्या-वस्त्यांवर फिरून  विक्री

सांगोला : कोरोनाच्या ताळेबंदीत शेतीमाल व भाजीपाल्याची साखळी खंडित झाल्यानंतर डिकसळ (ता. सांगोला) येथील प्रकाश गायकवाड यांनी कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष केले. कोरोनाला न घाबरता शेतकºयाकडून भाजीपाला व फळे खरेदी करून ते आई, वडील, पत्नी व भाच्याच्या सहकार्याने लॉकडाऊनच्या काळात सुमारे २८ हजार ४०० किलो भाजीपाला व फळे विक्री करून ५ लाखांच्या व्यवसायातून हजारो रूपये कमविले आहेत. डिकसळ येथील प्रकाश गायकवाड हा तरूण मागील १० वर्षांपासून फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे. तसा प्रकाश शिवसेनेचा शाखाप्रमुख असून आ. शहाजीबापू पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. समाजकारण व राजकारणामध्ये दंग असलेला प्रकाश आज गावासह परिसरात भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी तितकाच प्रसिद्ध आहे.

घरची केवळ ५ एकर शेतजमीन असून तीही पाण्याअभावी नापिक आहे. पण थोड्याफार जमिनीमध्ये भाजीपाला व अन्य पिके घेऊन प्रकाश आपला संसाराचा गाडा चालवित आहे. घरी आई, वडील व पत्नीच्या सहकार्याने दूध व्यवसायाबरोबरच पहाटे ५ वाजल्यापासून परिसरातील गावांमधून भाजीपाला व फळे खरेदी करून परिसरातील लोकांसाठी घरपोच सेवा देत आहे.

लॉकडाऊनपूर्वी प्रकाश आपला भाजीपाला खासगी वाहनातून मुंबईला पाठवित होता, परंतु लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे प्रकाशने या कालावधीत शेतकºयांकडून दैनंदिन खरेदी केलेली फळे व भाजीपाला गावठाण व वाड्या-वस्त्यांवर फिरून  विक्री करीत आहे. त्याने फळे व भाजीपाला येळवी, पारे, घेरडी, लोहगाव, वायफळ, हंगिरगे आदी गावांमधील शेतकºयांकडून खरेदी केला व तोच माल नियोजन करून डिकसळ परिसरासह वाड्यावस्त्यांवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वाड्या वस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या भाजीपाला मिळू लागला आहे.

गावामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये तो सतत प्रकाशमयच असतो. त्याच्या भाजीपाला व्यवसायाला भाचा गणेश शिंदे मोलाची साथ देत असल्यामुळे मामा -भाच्याने मिळून लॉकडाऊनच्या काळात आत्तापर्यंत २८ हजार ४००  किलो फळे व भाजीपाला विक्री करून सुमारे ५ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.

अशी केली फळे व भाजीपाला विक्री - टोमॅटो २ हजार ४०० किलो, वांगी ४ हजार किलो,मिरची ६०० किलो,गवार ५ हजार किलो,कांदा ३ हजार किलो,दोडका १ हजार किलो, सिमला मिरची १ हजार किलो ,कारले १ हजार किलो,कोबी ३ हजार किलो इतर पाले भाजीपाला ३ हजार जोड्या तर फळे-चिक्कू ३ हजार किलो, पेरू १ हजार ५०० किलो, कलिंगडे १ हजार किलो असा माल विक्री केला.

मागील दहा वर्षांपासून फळे व भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असून लॉकडाऊनपूर्वी हा सर्व माल मुंबईला पाठवित होतो. परंतु लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाला गाव परिसर वाड्यावस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. आत्तापर्यंत ५ लाख ४ हजार रुपये मालाच्या विक्रीतून दरमहा १५ ते २० हजार रुपये इतका नफा मिळाला आहे.- प्रकाश गायकवाड, भाजीपाला विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळे