शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पावणेतीन लाख शेतकरी आधार देईनात म्हणून किसान सन्मान निधी पासून "निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 16:29 IST

सहा लाखपैकी तीन लाख २४ हजार शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण : प्रशासनाच्या आवाहनाला मिळेना प्रतिसाद

सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. याचा लाभ सोलापुरातील लाखो शेतकऱ्यांना मिळाला आहे. सोलापुरात एकूण सहा लाख लाभार्थी असून, यापैकी तीन लाख २४ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी अर्थात आधार लिंक करून घेतले. उर्वरित पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे त्यांना सन्मान निधीपासून वंचित राहावे लागले आहे.

आधार लिंक करून घेण्याबाबत प्रशासनाने अनेकदा आवाहन केले. यास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना. दुसरीकडे अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला सन्मान निधी परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाच्या चुकीमुळे नोकरदार असलेल्या करदात्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर १४ कोटी ६३ लाख रुपये पंतप्रधान कृृषी सन्मान योजनेंतर्गत जमा झाले. ही भानगड प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर वसुलीची मोहीम सुरू झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, वसुली करायची कोणी?, हा प्रश्न कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

------------

कृषी अन् महसूलमध्ये विभागात मतभेद

प्रशासनाच्या कारकीर्दीत कृषी आणि महसूल विभागात पहिल्यापासून मतभेद आणि मनभेद आहेत. दोघेही राज्य शासनाकडून आलेली जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. अशीच काहीशी स्थिती पंतप्रधान कृषी सन्मान योजनेबाबत झाली आहे. या मतभेदामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचेही सांगण्यात आले.

---------

वसुलीचा तपशील असा

जिल्ह्यात एकूण सोळा हजार १४ करदाते शेतकरी आहेत. यातील पंधरा हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी ६३ लाख रुपये जमा झाले. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ७३ हजार हप्ते जमा झाले आहेत. ३९ हजार ४४९ करदात्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सात कोटी एकूण ९० लाख रुपये अनुदान परत केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून जवळपास सात कोटी रुपये येणे बाकी आहे.

-------------

आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान निधीअंतर्गत केंद्र सरकारतर्फे लाभ देण्यात येत आहे. एप्रिल २०२२नंतरच्या लाभासाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे.

- शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसानच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरAdhar Cardआधार कार्डPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना