शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

क्षेत्र १०० गुंठे...दिवस ९० अन् उत्पन्न मिळाले दोन लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:28 IST

वैरण, मक्याचे दुहेरी उत्पन्न; वाळूज येथील मोटे दाम्पत्याची यशोगाथा

ठळक मुद्देकमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक येते़ ग्रामीण भागात शेतीला पशुपालन हा मुख्य जोडव्यवसायऊस आणि फळपिकांइतके कष्ट आणि खर्च मक्याला येत नाही़पारंपरिक २० एकरात तीच पिके घेतली जातात. थोडा बदल, प्रयोग म्हणून मक्याचा प्रयोग केला

संभाजी मोटे वाळूज : पारंपरिक २० एकरात तीच पिके घेतली जातात. थोडा बदल, प्रयोग म्हणून मक्याचा प्रयोग केला. कमी पाण्यावर आणि कमी श्रमात हे पीक ९० दिवसांत घेणे शक्य झाले आहे़ चक्क शंभर गुंठ्यात दोन लाखांचे पीक निघाले़ ही किमया मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील एका तरुण दाम्पत्याने साधली आहे.

ज्ञानेश्वर मोटे आणि रेश्मा मोटे असे त्या शेतकºयाचे नाव आहे. वडील केशव मोटे आणि जांबुवती मोटे यांनी शेतामध्ये साथ दिली. प्रारंभी त्यांनी नांगरणी करून शेत स्वच्छ करून घेतले़ नंतर सरी सोडून जमीन लागवडीलायक करून घेतली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ड्रोन या वाणाच्या मक्याची लागवड केली़ एका महिन्यानंतर त्यांनी पहिली फवारणी केली. १०० गुंठे क्षेत्रात तीन बाय दीड अंतरावर लागवड केली. त्यानंतर दोन वेळेस खुरपणी केली. मक्याची वाढ पाच फूट झाल्यानंतर लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोराजिन निआॅन अस्त्र आणि फायटर या औषधांच्या पाच फवारण्या केल्या. तसेच वाढीसाठी शेणखत, युरिया, १०.२६.२६ ही खते वापरली़ ९० दिवसांत मका काढणीसाठी आला़ त्यातल्या त्यात दूध देणारी जर्सी गाय, म्हैस असणाºया पशुपालकांना एक गुंठा २ हजार रुपये दराने चाºयासाठी कणसासहित देण्यात आली़ लागवड, खुरपणी, खते फवारणीसाठी एकूण खर्च २० हजार रुपये झाला़ १०० गुंठे क्षेत्रात यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

त्याच क्षेत्रात इतर पिकेही घेतली- शेतकरी मोटे यांना एकूण दहा एकर शेती आहे. त्यांनी ज्वारी, हरभरा आणि ऊस ही पिके घेतली. ते नेहमी या क्षेत्रावर वैरणीसाठी मक्याची लागवड करतात. गावालगत रोडच्या कडेला शेत आहे. परिसरातील देगाव, मुंगशी, भागाईवाडी, साखरेवाडी येथील पशुपालक वैरणीसाठी हिरवा चारा म्हणून मका घेऊन जातात. मका हे पीक ९० दिवसात काढणीला येते. परिसरात दुभती जनावरे जास्त आहेत़ जनावरांना वैरणीसाठी आणि दूधवाढीसाठी मक्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो़ 

कमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक येते़ ग्रामीण भागात शेतीला पशुपालन हा मुख्य जोडव्यवसाय आहे़ ऊस आणि फळपिकांइतके कष्ट आणि खर्च मक्याला येत नाही़ हे पीक कोणीही घेऊन स्वत:चा शेती व्यवसाय चांगल्यारित्या चालवू शकतो़ लष्करी अळींवर मात करीत घेतले दोन लाखांचे मकापीक घेतले़- ज्ञानेश्वर मोटे, मका उत्पादक 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी