आरटीईअंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:49 IST2021-02-05T06:49:23+5:302021-02-05T06:49:23+5:30

खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यीत शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील आर्थिक दुर्बल व वंचित घटक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विशेष ...

Appeal for admission of 25% students under RTE | आरटीईअंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आवाहन

आरटीईअंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आवाहन

खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यीत शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील आर्थिक दुर्बल व वंचित घटक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, एसईबीसी, अपंग, विधवा व घटस्फोटित पालकांचे पाल्य आदी प्रवर्गांतील एकूण पटाच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे.

त्या दृष्टीने येणाऱ्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया चालू झाली आहे. शाळांनी ८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षण विभागाकडे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणी झालेल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी २६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावयाचे आहेत. ५ मार्च रोजी सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. यावर्षी एकदाच सोडत काढली जाणार असल्याने संबंधित शाळा आणि पालकांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन महारुद्र नाळे यांनी केले आहे.

Web Title: Appeal for admission of 25% students under RTE