शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो अन् नाहक चौकशीला सामोरे जावे लागते - विजयसिंह मोहिते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:55 IST

अकलूज : शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या ...

ठळक मुद्दे अकलूज येथे टंचाई आढावा बैठकया बैठकीत एकाही संस्थेने चारा छावणी सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली नाहीमाळशिरस तालुक्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

अकलूज : शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या फायदा मिळविण्यासाठी चालविल्या जात नाहीत तर मुक्या प्राण्याला चारा, पाणी मिळावे म्हणून चालविल्या जातात, परंतु माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो आणि संस्थांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये वेळ, पैसा व नाहक बदनामीला सामोरे जावे लागते अशी टीका खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली. 

याबाबत तालुक्यातील सहकारी व सेवाभावी संस्थांची बैठक खा. मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकार महर्षी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात घेण्यात आली. बैठकीस पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, नायब तहसीलदार तुषार देशमुख, एन. डी. काळे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश रेडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जहागीरदार, पंचायत समिती सदस्य प्रताप पाटील, गजानन एकतपुरे, मानसिंग मोहिते, शोभा साठे, विद्या वाघमोडे, हेमलता चांडोले, ताई महाडिक, लतिका कोळेकर, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार, संचालक संग्राम रणवरे, २१ टंचाई गावातील विकास सोसायटीचे चेअरमन, सचिव, ग्रामसेवक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत एकाही संस्थेने चारा छावणी सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली नाही. माळशिरस तालुक्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाचे जाचक नियम, आर्थिक असक्षमता यामुळे कोणतीही सहकारी संस्था वा सेवाभावी संस्था चारा छावणी काढण्यास तयार नाही. सर्व अडचणी लक्षात घेऊन शासनाने विनाविलंब चारा डेपो सुरू करावा असेही ते म्हणाले. 

यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून चारा डेपो सुरु करावा, अशी मागणी केली. माळशिरस तालुक्यातील पिलीव, सुळेवाडी, झंजेवस्ती, पठाणवस्ती, शिंगोर्णी, बचेरी, काळमवाडी, पिरळे, भांब, गारवाड, मगरवाडी, कन्हेर, जळभावी, रेडे, गिरवी, कोथळे, गोरडवाडी, फोंडशिरस, शेंडेवाडी, कारुंडे व फडतरी या २१ गावात दुुुुष्काळामुळे सध्या मोठ्या प्रमाणात चारा टंचाई जाणवत आहे. या २१ गावात लहान ७ हजार ४९८ व मोठी २९ हजार ७५६ अशी एकूण ३७ हजार २५४ जनावरांची संख्या आहे. लहान जनावरांना प्रतिदिन सुमारे ७.५ तर मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो हिरव्या चाºयाची गरज आहे. तालुक्यात आता केवळ चार दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. साखर कारखाने बंद झाल्याने उसाचा चारा मिळेनासा झाला आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी येत्या ४ दिवसात पिलीव, नातेपुते व माणकी येथे चारा छावण्या उघडणे गरजेचे असल्याचे मोहिते-पाटील म्हणाले.

चारा डेपो सुरू करा अन्यथा आंदोलन च्शासनाच्या जाचक अटी व चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेक सहकारी व  सेवाभावी संस्था चारा छावण्या चालविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील हजारो जनावरांवर उपासमारीची वेळ येऊन पडली. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्यापूर्वीच शासनाने या टंचाईग्रस्त २१ गावात येत्या आठ दिवसात चारा डेपो सुरु करावा, परंतु चारा, पाण्यावाचून जनावरे उपाशी मरु देऊ नयेत, असे झाले तर तालुक्यातील शेतकरी व जनावरांसह तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता