शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

'कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडूच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:35 IST

संपातील कर्मचाऱ्यांची विनामोबदला बाजू मांडणारे ॲड. सदावर्ते यांनी नांदेड येथील एक खासगी कार्यक्रम संपवून परत मुंबईला जाताना बार्शी येथे बस आगारातील संपात असलेल्या कामगारांची भेट घेतली.

ठळक मुद्देपुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले, सध्या सरकार विविध मार्गांनी हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, एकी तोडू नका, असे म्हणत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर/बार्शी : राज्यातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो लढा उभा केला, त्यात कोणत्याही संघटनेचा संबंध आहे. ही लढाई सीमेवरच्या सैनिकांप्रमाणेच आहे. सरकार वेळकाढूपणा करत असले तरी कोणत्याही परिस्थतीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असा विश्वास ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला.

संपातील कर्मचाऱ्यांची विनामोबदला बाजू मांडणारे ॲड. सदावर्ते यांनी नांदेड येथील एक खासगी कार्यक्रम संपवून परत मुंबईला जाताना बार्शी येथे बस आगारातील संपात असलेल्या कामगारांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रथम तेथील शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुहास भालेकर, नितीन गवळी, रामदास भाकरे, उमेश पवार, फिरोज मुलानी, कपिल लुकडे, हेमत साठे, संतोष गुंड, यांच्यासह भूम, तुळजापूर ,सोलापूर, कुर्डूवाडी या आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले, सध्या सरकार विविध मार्गांनी हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, एकी तोडू नका, असे म्हणत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या 45 दिवसांपासून संपावर आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी त्यांचा संप सुरू आहे. या संपाबाबत, आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

टॅग्स :ST Strikeएसटी संपSolapurसोलापूरBus DriverबसचालकCourtन्यायालय