शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पुरात वाहून गेलेल्या जनावरांची भरपाई मिळणार; अजित पवार यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:08 IST

पोस्टमार्टेमऐवजी पंचनाम्यावर देणार मंजुरी

सोलापूर : अतिवृष्टीने भीमा, सीना व नीरा या नद्यांना आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या जनावरांची नुकसानभरपाई देण्यासाठी पोस्टमार्टेमऐवजी पंचनामे ग्राह्य धरा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहेत.

जिल्ह्यात १३ ऑक्टोबरपासून वादळी वाऱ्यासह झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर नद्यांना आलेल्या महापुराचा तडाखा जसा शेतीला बसला तसा जनावरांनाही बसला होता. यामध्ये ११ तालुक्यांतील ८४ गावांमधील जनावरे वाहून गेली तर काही जनावरे मृत्युमुखी पडली होती. यामध्ये गाई: १२९, बैल:८, वासरे: ४१, म्हैस: ४६, रेडके: ११, शेळ्या: १४४, करडे: ११, घोडा:१ आणि कोंबड्या: १४ हजार १७१ अशी संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत अहवाल सादर केला होता. यावरून शासनाकडे नुकसानभरपाई मागण्यात आली होती. शासनाने भरपाई मंजूर केल्यावर महसूल विभागातर्फे आता शेतकऱ्यांना मेलेला जनावराचा पोस्टमार्टेम अहवाल सादर करण्याची अट घातली आहे. पुरात वाहून गेलेल्या जनावरांचे पोस्टमार्टेम झालेच नसल्याने भरपाई मिळण्यास अडचण निर्माण झाली होती.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी मंगळवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे या मागणीकडे लक्ष वेधले. त्यावर अजित पवार यांनी तातडीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व शासनाचे सचिव यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व तत्काळ शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचे आदेश दिले.

तर पोस्टमार्टेम कसे होईल

पुरात वाहून गेलेल्या जनावरांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट कसले मागता. सांगलीमध्येही अशी समस्या निर्माण झाली होती. पंचनामा ग्राह्य धरून शेतकऱ्यांना तत्काळ मदत वितरित करा. अतिवृष्टीने नुकसान झालेली पिके, नदीकाठची जमीन, घरांची पडझड यासाठी निधी दिला आहे. निधी कमी पडत असेल तर आणखी मागणी करा, पण शेतकऱ्यांना मदत तातडीने द्या अशा सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय धरणे उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊस