शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या छावण्या ३१ आॅगस्टपूर्वी बंद होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:27 IST

आदित्य ठाकरे : माढ्यातील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा

ठळक मुद्देमाढ्यातील शालेय विद्यार्थी शिवराज गायकवाड यांनी दप्तराच्या ओझ्याबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीकर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले मात्र कर्जमाफी न झालेल्या शेतकºयांनी पदाधिकाºयांशी संपर्क  साधण्याचे आवाहन सुजलाम् सुफलाम्, दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन

माढा : दुष्काळाची तीव्रता गंभीर असून, ३१ आॅगस्टच्या अगोदर छावण्या बंद होणार नाहीत, याची काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा दिला आहे.

माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी येथील शेतकºयांना वरील दिलासा दिला़ प्रारंभी वडशिंगे येथील शालेय विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत, खा़ ओमराजे निंबाळकर, सचिन आहिर, जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत, झेडपी सदस्य धनंजय सावंत, युवा नेते पृथ्वीराज सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, नगरसेवक मनोज शेजवाल, जिल्हा अध्यक्ष संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख चरणराज चवरे, तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, युवासेनेचे वैभव मोरे, मुन्ना साठे, शंभू साठे, राजेंद्र्र वाल्मिकी, समाधान दास उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, या यात्रेतून मी मत मागायला आलो नसून जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्या स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, हे जाणून घ्यायला आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

माढ्यातील शालेय विद्यार्थी शिवराज गायकवाड यांनी दप्तराच्या ओझ्याबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी लवकरच यावर तोडगा काढण्यासंदर्भात प्रयत्न असणार असल्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले़

कर्जमाफी नकोय़़क़र्जमुक्ती हवी आहे- कर्जमाफीच्या मुद्यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी शेतकºयांना कर्जमाफी नकोय, कर्जमुक्ती हवी असल्याचे म्हणाले़ निवडणुका आल्यावर अनेक पक्ष येतात, वाकून नमस्कार करतात, मते मागतात़ मात्र पाच वर्षे शिवसेना जनतेसोबत कायम राहत असते.  कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले मात्र कर्जमाफी न झालेल्या शेतकºयांनी पदाधिकाºयांशी संपर्क  साधण्याचे आवाहन यावेळी केले.  सुजलाम् सुफलाम्, दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सत्तेत असो किंवा नसो़़़ दिलेले वचन शिवसेना पूर्ण करत असून, देश व संपूर्ण महाराष्ट्र भगवा झाला आहे़ यापुढील काळातही भगवा करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीFarmerशेतकरीAditya Thackreyआदित्य ठाकरे