शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अमराठी; पण मायमराठीची अजोड सेवा ! सोलापुरातील हे आहेत शारदेचे सेवक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:51 IST

ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. मायमराठीत विपुल साहित्य लेखन केले आहे. शिवाय विविध कलांचेही सादरीकरण केले आहे. मूलत: तेलुगू भाषिक असलेले कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे योगदान तर थक्क करणारे आहे. याशिवाय सोलापुरात असे अनेक मराठीप्रेमी अमराठी आहेत.  मराठी हा आमचा श्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देहत्तरसंगकुडल येथील शिलालेखाचा संशोधक आनंद कुंभार, शाहीर डॉ. अजीज नदाफ आणि गझलकार बदिउज्जमा बिराजदार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या. महाराष्ट्रात अहिरानी, चंदगडी, खान्देशी इत्यादी लोकभाषा आहेत़ आदिवासींच्या २२ भाषा आहेत़ तर भटक्या विमुक्त जमातीच्या ३ भाषा आहेत़अभिजात दर्जाच्या दृष्टीने या सर्व बोलीभाषांचा समावेश मराठीत होणे गरजेचे आहे़ 

आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि २७ : ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. मायमराठीत विपुल साहित्य लेखन केले आहे. शिवाय विविध कलांचेही सादरीकरण केले आहे. मूलत: तेलुगू भाषिक असलेले कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे योगदान तर थक्क करणारे आहे. याशिवाय सोलापुरात असे अनेक मराठीप्रेमी अमराठी आहेत.  मराठी हा आमचा श्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हत्तरसंगकुडल येथील शिलालेखाचा संशोधक आनंद कुंभार, शाहीर डॉ. अजीज नदाफ आणि गझलकार बदिउज्जमा बिराजदार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या. महाराष्ट्रात अहिरानी, चंदगडी, खान्देशी इत्यादी लोकभाषा आहेत़ आदिवासींच्या २२ भाषा आहेत़ तर भटक्या विमुक्त जमातीच्या ३ भाषा आहेत़ त्याप्रमाणे भटक्या विमुक्त जमाती सांकेतिक भाषा, नाथपंथी डवरी भाषा, वडारी वैदू भाषा आणि दखनी भाषा बोलणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे़ अभिजात दर्जाच्या दृष्टीने या सर्व बोलीभाषांचा समावेश मराठीत होणे गरजेचे आहे़ त्यादृष्टीने अलीकडच्या काळात विविध आदिवासी व भटक्या जमातीच्या लोकांनी मराठीत साहित्याची मोठी भर घातली आहे़ त्या दिशेने मराठीचा अभ्यास होणे गरजेचे आहे व त्याचे लेखन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.----------------------च्प्रा. डॉ. अजीज नदाफ हे मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. शिवाय एक दर्जेदार शायर म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. मराठी शाहिरीचा शोध हा प्रा. अजीज नदाफ यांचा मुख्य अभ्यास विषय आहे. उर्दू भाषिक असूनही ६१ वर्षांपासून मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी नदाफ यांनी काम केले आहे़ मराठी शाहीर अमर शेख यांचे पोवाडे, लोकगीते व लावण्या नावाचे संकलन प्रकाशित केले आहे़ प्रा. फक्रुद्दीन बेन्नुर यांच्या समवेत            डॉ. नदाफ यांनी १९८९ साली अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. --------------------आनंद कुंभार : मराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोधआनंद कुंभार हे सोलापूरचेच आहेत़ त्यांनी नाटक, कविता, लेख लिहिले़ इतिहासाचे संशोधन केले. १९७४ साली हत्तरसंगकुडल येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरात मराठी भाषेतील पहिला शिलालेख शोधला. त्यानंतर १९७५ साली तो पुढे आला आणि त्याबाबतची माहिती १९८८ सालच्या पुस्तकात उतरविला गेला़--------------- बदिऊज्जमा बिराजदार : मराठी गझलकारबदिऊज्जमा बिराजदार हे मूळचे सोलापूरचे आहेत़ मराठी गझलकार म्हणून महाराष्टÑ त्यांना ओळखतो. त्यांनी विविध संमेलनात भाग घेतला ७१ व्या व ७९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सहभाग, अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाची मेजवानी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या गोवा व पणजी येथील १0 शेकोटी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष झाले. बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलन यामध्ये बिराजदार यांना दाद मिळाली.

टॅग्स :SolapurसोलापूरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018