शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अमराठी; पण मायमराठीची अजोड सेवा ! सोलापुरातील हे आहेत शारदेचे सेवक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:51 IST

ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. मायमराठीत विपुल साहित्य लेखन केले आहे. शिवाय विविध कलांचेही सादरीकरण केले आहे. मूलत: तेलुगू भाषिक असलेले कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे योगदान तर थक्क करणारे आहे. याशिवाय सोलापुरात असे अनेक मराठीप्रेमी अमराठी आहेत.  मराठी हा आमचा श्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देहत्तरसंगकुडल येथील शिलालेखाचा संशोधक आनंद कुंभार, शाहीर डॉ. अजीज नदाफ आणि गझलकार बदिउज्जमा बिराजदार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या. महाराष्ट्रात अहिरानी, चंदगडी, खान्देशी इत्यादी लोकभाषा आहेत़ आदिवासींच्या २२ भाषा आहेत़ तर भटक्या विमुक्त जमातीच्या ३ भाषा आहेत़अभिजात दर्जाच्या दृष्टीने या सर्व बोलीभाषांचा समावेश मराठीत होणे गरजेचे आहे़ 

आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि २७ : ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. मायमराठीत विपुल साहित्य लेखन केले आहे. शिवाय विविध कलांचेही सादरीकरण केले आहे. मूलत: तेलुगू भाषिक असलेले कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे योगदान तर थक्क करणारे आहे. याशिवाय सोलापुरात असे अनेक मराठीप्रेमी अमराठी आहेत.  मराठी हा आमचा श्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हत्तरसंगकुडल येथील शिलालेखाचा संशोधक आनंद कुंभार, शाहीर डॉ. अजीज नदाफ आणि गझलकार बदिउज्जमा बिराजदार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या. महाराष्ट्रात अहिरानी, चंदगडी, खान्देशी इत्यादी लोकभाषा आहेत़ आदिवासींच्या २२ भाषा आहेत़ तर भटक्या विमुक्त जमातीच्या ३ भाषा आहेत़ त्याप्रमाणे भटक्या विमुक्त जमाती सांकेतिक भाषा, नाथपंथी डवरी भाषा, वडारी वैदू भाषा आणि दखनी भाषा बोलणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे़ अभिजात दर्जाच्या दृष्टीने या सर्व बोलीभाषांचा समावेश मराठीत होणे गरजेचे आहे़ त्यादृष्टीने अलीकडच्या काळात विविध आदिवासी व भटक्या जमातीच्या लोकांनी मराठीत साहित्याची मोठी भर घातली आहे़ त्या दिशेने मराठीचा अभ्यास होणे गरजेचे आहे व त्याचे लेखन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.----------------------च्प्रा. डॉ. अजीज नदाफ हे मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. शिवाय एक दर्जेदार शायर म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. मराठी शाहिरीचा शोध हा प्रा. अजीज नदाफ यांचा मुख्य अभ्यास विषय आहे. उर्दू भाषिक असूनही ६१ वर्षांपासून मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी नदाफ यांनी काम केले आहे़ मराठी शाहीर अमर शेख यांचे पोवाडे, लोकगीते व लावण्या नावाचे संकलन प्रकाशित केले आहे़ प्रा. फक्रुद्दीन बेन्नुर यांच्या समवेत            डॉ. नदाफ यांनी १९८९ साली अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. --------------------आनंद कुंभार : मराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोधआनंद कुंभार हे सोलापूरचेच आहेत़ त्यांनी नाटक, कविता, लेख लिहिले़ इतिहासाचे संशोधन केले. १९७४ साली हत्तरसंगकुडल येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरात मराठी भाषेतील पहिला शिलालेख शोधला. त्यानंतर १९७५ साली तो पुढे आला आणि त्याबाबतची माहिती १९८८ सालच्या पुस्तकात उतरविला गेला़--------------- बदिऊज्जमा बिराजदार : मराठी गझलकारबदिऊज्जमा बिराजदार हे मूळचे सोलापूरचे आहेत़ मराठी गझलकार म्हणून महाराष्टÑ त्यांना ओळखतो. त्यांनी विविध संमेलनात भाग घेतला ७१ व्या व ७९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सहभाग, अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाची मेजवानी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या गोवा व पणजी येथील १0 शेकोटी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष झाले. बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलन यामध्ये बिराजदार यांना दाद मिळाली.

टॅग्स :SolapurसोलापूरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018