शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सोलापूरात पीक कर्जाच्या वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांची आघाडी, जिल्हा मध्यवर्ती बँक मागे

By admin | Published: June 30, 2017 12:52 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : एकीकडे कर्जमाफीच्या घोषणेमुळे कर्जबाकी भरण्यासाठी शेतकरी व नव्याने कर्ज देण्यासाठी बँका उदासीन असतानाच खरिपासाठी आतापर्यंत जिल्हाभरातील बँकांनी ४०४ कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे १५९० कोटी ४३ लाख रुपये इतके उद्दिष्ट आहे. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीला वेग आला आहे. मागील वर्षी जून अखेरला पावसाने सुरुवात केली होती त्यामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र सरासरीच्या तिप्पट झाले होते. यावर्षी चार जूनपासूनच जिल्ह्णात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत पेरणीसाठी बँकांकडून जुने कर्ज भरणे व नव्याने कर्ज मागणे तसेच अनेक शेतकरी प्रथमच पीक कर्ज घेत आहेत. पाऊस चांगला असल्याने बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे कर्ज वाटपाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका तसेच ग्रामीण बँकेने आतापर्यंत ४०४ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका पुढे आहेत.---------------------कर्ज वाटपाचा वेग मंदावला- जिल्हा मध्यवर्ती बँकेने १४ हजार ७५० शेतकऱ्यांना १०५ कोटी ९१ लाख रुपये वाटप केले असून, मागील वर्षी याच कालावधीत १९१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले होते.- ग्रामीण बँकेने ७१५ शेतकऱ्यांना ९ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीत १२ कोटी ९२ लाख रुपये कर्ज वाटले होते.- राष्ट्रीयीकृत बँकांनी १८ हजार ७६९ शेतकऱ्यांना २८८ कोटी ४४ लाख रुपये इतक्या कर्जाचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीपर्यंत २३१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले ़- २७ जूनपर्यंत एकूण ४०४ कोटी कर्ज वाटप झाले असून, मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ४३६ कोटी ४८ लाख रुपयांचे वाटप झाले होते.----------------------जिल्हा बँक शून्यावरच...कर्जदार शेतकऱ्यांना तर कर्ज दिलेच पाहिजे शिवाय नव्या सभासदांनाही कर्ज देणे बंधनकारक आहे. जिल्हा बँकेने मात्र नव्या एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. ग्रामीण बँकेने २२ तर राष्ट्रीयीकृत बँकांनी २५ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज दिले आहे. मागील वर्षीपेक्षा ८६ कोटी कर्जाचे वाटप कमी करणाऱ्या जिल्हा बँकेने नव्याने एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही.------------------आमच्याकडे पैसे नाहीत हे आम्ही सांगत आहोत. कारखानदार, शिक्षण संस्थांप्रमाणेच शेतकऱ्यांनीही घेतलेले कर्ज भरण्यासाठी पाठ फिरविल्याने इच्छा असूनही कर्ज देऊ शकत नाही.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक