शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

अकलूज : पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय राजमार्गासाठी हरकती नोंदविण्यासाठी शेतकºयांची गर्दी, १५७ नागरिकांनी घेतल्या हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:27 IST

केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सोलापूर जिल्ह्यातील राजमार्ग क्ऱ ९६५ चे कि.मी.५९ ते ११७ पर्यंत प्रस्तावित मार्गावरील संपादित करण्यात येणाºया बांधीव अथवा मोकळ्या जमिनीबाबत अधिसूचना काढल्याने या रस्त्याला हरकत घेण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी अकलूज उपविभागीय कार्यालयात गर्दी केली होती.

ठळक मुद्देमाळशिरस तालुक्यातील पुणे-पंढरपूर-मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावरील दसूर, तोंडले, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, पिसेवाडी, विझोरी, खुडूस, डोंबाळवाडी या गावांतील सुमारे १५७ नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाबाबत हरकती घेतल्याअकलूज येथील उपविभागीय कार्यालयात प्रांताधिकारी शमा पवार यांनी या नागरिकांच्या हरकती जाणून घेतल्याभारत सरकारने मोहोळ-पंढरपूर-पुणे रस्त्याची अधिसूचना जाहीर केल्यानंतर शेतकºयांनी अकलूजच्या उपविभागीय कार्यालयात रस्त्यालगतचे आपले क्षेत्र किती गेले हे पाहण्यासाठी गर्दी

आॅनलाइन लोकमत सोलापूरअकलूज दि ३१ : केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सोलापूर जिल्ह्यातील राजमार्ग क्ऱ ९६५ चे कि.मी.५९ ते ११७ पर्यंत प्रस्तावित मार्गावरील संपादित करण्यात येणाºया बांधीव अथवा मोकळ्या जमिनीबाबत अधिसूचना काढल्याने या रस्त्याला हरकत घेण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी अकलूज उपविभागीय कार्यालयात गर्दी केली होती.माळशिरस तालुक्यातील पुणे-पंढरपूर-मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावरील दसूर, तोंडले, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, पिसेवाडी, विझोरी, खुडूस, डोंबाळवाडी या गावांतील सुमारे १५७ नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाबाबत हरकती घेतल्या. याबाबत अकलूज येथील उपविभागीय कार्यालयात प्रांताधिकारी शमा पवार यांनी या नागरिकांच्या हरकती जाणून घेतल्या. पूर्वी पाण्याची फारशी व्यवस्था नसल्याने या राज्यमार्गालगतची हजारो एकर शेती पडिक होती. या पडिक जमिनीतून रस्त्याचे अतिक्रमण होऊनही शेतकºयांनी कधी तक्रार केली नाही. आता माळशिरस तालुक्यातील रस्त्यालगतची जमीन बागायती झाली आहे. लोकवस्ती वाढल्याने या रस्त्यालगत मोठमोठ्या इमारती व व्यावसायिक बांधकामे झाली आहेत.भारत सरकारने मोहोळ-पंढरपूर-पुणे रस्त्याची अधिसूचना जाहीर केल्यानंतर शेतकºयांनी अकलूजच्या उपविभागीय कार्यालयात रस्त्यालगतचे आपले क्षेत्र किती गेले हे पाहण्यासाठी गर्दी केली होती व तक्रारी दाखल केल्या होत्या. माळशिरस तालुक्यातील दसूर ते धर्मपुरीपर्यंतचे क्षेत्र या राष्ट्रीय राजमार्गासाठी अधिग्रहण करण्यात येणार आहे. याबाबत हरकत घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली होती. भारत सरकारने अधिग्रहण केलेली जमीन ही पहिल्या महाड-पंढरपूर रस्त्याला धरूनच केल्याने १९७० मध्ये राज्यशासनाने अधिग्रहण केलेल्या जमिनीची शासनदरबारी नोंदच नसल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे १९७० साली रस्त्यासाठी घेतलेली जमीन व आता राष्ट्रीय राजमार्गासाठी घेण्यात येणारी जमीन या दोन्हीचीही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.-------------------------जिल्हाधिकारी कार्यालयाला भूसंपादन करण्याचे अधिकार - पुणे-फलटण-पंढरपूर-मोहोळ हा राष्ट्रीय महामार्ग ४५ मीटरचा आहे. या महामार्गामुळे अनेक शेतकºयांच्या जमिनी जात आहेत तर अनेक जण भूमिहीन होत आहेत. काही लोकांची घरे, दुकाने, फळबागा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बोंडले गावातून पहिल्या राज्यमार्गाचे अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई झाली आहे. तर नवीन राष्ट्रीय महामार्ग हा तोंडले व बोंडले या गावातून जात असल्याने या भागातील लोकांचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी महामार्ग बदलण्याची मागणी होत आहे तर काही ठिकाणी विहीर, विंधन विहीर, फळबागा जात असल्याने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. याबाबत सविस्तर अहवाल तयार करुन केंद्र शासनाला पाठविला जाईल. भूसंपादन करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला आहेत. नुकसानभरपाई देण्याचे अधिकार केंद्राला आहेत. जुन्या रस्त्याबाबत अनेक तक्रारी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांची नुकसानभरपाई याबाबत आताच सांगणे शक्य होणार नाही. या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात येणाºया जमिनीची मोजणी १५ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्गाचा सध्या तयार केलेला नकाशा हा अंतिम नसून त्यामध्ये दुरुस्ती होण्याची शक्यता असल्याचे प्रांताधिकारी शमा पवार यांनी सांगितले.---------------------वेळापूरला उड्डाण पूल नको - राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे गाव म्हणून वेळापूर ओळखले जाते. वेळापूर-पंढरपूर या मार्गावर इंद्रनील मंगल कार्यालयाजवळून लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्ग जाणार आहे. त्यामुळे धुमाळी ते उघडेवाडी रोड या सुमारे तीन कि. मी. रस्त्यावर उड्डाण पूल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उड्डाण पूल झाल्यास गावचे अर्थकारण बिघडेल. इंद्रनील मंगल कार्यालयाजवळून जाणाºया लोणंद-पंढरपूर या रेल्वेमार्गावर गेट करावे. उड्डाण पूल करु नये, अशी मागणी नागरिकांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्ग