शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अहमदनगरची निर्यातक्षम साखर विदेशात; सोलापूर विभागातून पोहोचली मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 12:48 IST

मध्य रेल्वे - २१ वॅगनने भरलेली दीड हजार टन साखर मालवाहतुकीने मुंबईकडे रवाना

सोलापूर : अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार झालेली निर्यातक्षम साखर मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक (जि. अहमदनगर) येथून विदेशात पाठविण्यासाठी मुंबई येथील व्हिक्टोरिया डॉककडे पहिली मालवाहतूक गाडी रवाना झाली आहे. दरम्यान, २१ वॅगनमध्ये भरलेली १ हजार ३२९ टन साखर रेल्वेच्या मालवाहतूक गाडीने मुंबईत पोहोचल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कोरोना महामारीत लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रेल्वेच्या प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे. या काळात रेल्वेने मालवाहतूक गाड्यांवर जास्तीचा भर दिला आहे. नवनवीन गुड्स शेडमधून सध्या मालवाहतूक गाड्या मोठ्या प्रमाणात धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या श्रीगोंदा रेल्वे स्थानक परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या गुड्स शेडमधून मंगळवारी २१ वॅगनने भरलेली मालवाहतूक रेल्वेगाडी रवाना झाली. यातून १ हजार ३२९ टन साखर मुंबईला पाठविण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार झालेल्या साखर कमी वाहतूक खर्चात जास्तीचे अंतर कापून पोहोचत असल्याने शेतकरी, साखर कारखाना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दुसऱ्या मालगाडीसाठी साखर पोती तयार

पहिल्या मालवाहतूक गाडीतून यशस्वी वाहतूक झाल्यानंतर दुसरी मालवाहतूक गाडी गुरूवारी किंवा शुक्रवारी रवाना होणार आहे. २१ वॅगन भरेल एवढी साखर तयार असून, त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे. मालवाहतुकीमुळे कमी वेळेत, कमी भाड्यात, जास्तीचे अंतर पार करून संबंधित कारखान्यांचा माल योग्य स्थळी पोहोचत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेSugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगर