शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अहिल्यादेवींचे स्मारक लोकवर्गणीतून नको; शासकीय निधीमधूनच साकारायला हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 16:10 IST

धनगर विवेक जागृती अभियान संघटनेची मागणी;  कुलगुरूंची चौकशी करा, ढोबळेंना समितीतून वगळा

ठळक मुद्दे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणारे लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे ?स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य शासनाच्या निधीमधूनच तयार करावेअहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी

सोलापूर : विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा घाट कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घातला आहे. या प्रकरणातील त्यांचे कामकाज संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

   तसेच हे स्मारक शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी भूमिका ढोणे यांनी मांडली आहे. विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याला विरोध करणाºया माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून वगळावे, अशी मागणी त्यांनी कली आहे. दरम्यान, जागृती समितीचे ढोणे यांनी आज जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन अनुषंगिक मागण्या केल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणारे लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे, असा सवालही ढोणे यांनी विचारला आहे. स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य शासनाच्या निधीमधूनच तयार करावे, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी. 

यासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईची चौकशी व्हावी, विद्यापीठाला पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळासाठी आवश्यक तरतूद करावी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून तातडीने वगळण्यात यावे, या प्रमुख मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

कुलगुरूंच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी गेले दोन-अडीच महिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारकासंदर्भात राज्यभरातील धनगर समाजामध्ये चर्चा आहे. धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून स्मारक उभारण्याचे नियोजन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाकाळात सर्व जण अस्तित्वाची लढाई लढत असताना कुलगुरू फडणवीस यांनी अत्यंत घाईगडबडीने स्मारक समिती स्थापन करून अनुषंगिक बैठका घेतल्या आहेत. त्यांनी मनमानी पद्धतीने ही प्रक्रिया राबवलेली आहे. काहींनी आक्षेप घेतल्यानंतर दोन वेळा या समितीचा विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या समितीत विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. त्यावेळी राज्य सरकारच्या यंत्रणेला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले होते. नंतर पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाºयांना समितीत घेण्यात आले. तसेच इतर पक्षांचे लोकही घेण्यात आले आहेत. आक्षेपार्ह बाब म्हणजे ज्या लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्यायला विरोध केला. त्यांना अहिल्यादेवींच्या स्मारक समितीवर सन्मानाने घेण्यात आले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या प्रत्येक बाबीची पडताळणी गरजेची आहे.

...अन्यथा आंदोलन !पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीनिमित्ताने शासनाला हे निवेदन देत आहोत. ज्यांनी लोकोद्धारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले त्या अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी विद्यापीठ अथवा महाराष्ट्र शासनाकडे निधी नाही, हा प्रकार लांच्छनास्पद आहे. याउपर फक्त धनगर समाजाची वर्गणी डोळ्यांसमोर ठेवून करण्यात येत असलेले नियोजन जखमेवर मीठ चोळणारे आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा आणि अहिल्यादेवींची सुरू असलेली अवहेलना थांबवाबी. सध्या कोरोना संकटात आमचे प्रशासनाला सहकार्य आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरuniversityविद्यापीठEducationशिक्षण