आजारपणास कंटाळून वृद्धाची आत्महत्या
By Admin | Updated: May 3, 2014 14:47 IST2014-05-03T13:23:36+5:302014-05-03T14:47:35+5:30
नीरा नदीच्या पुलाखाली आजारास कंटाळून वयोवद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी घडली. या घटनेची अकलूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

आजारपणास कंटाळून वृद्धाची आत्महत्या
अकलूज : सोलापूर-पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर, नीरा नदीच्या पुलाखाली आजारास कंटाळून वयोवद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी घडली. या घटनेची अकलूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
माळशिरस येथील एस. टी. स्टॅन्डजवळ राहणार्या जंबुलाल मियाँ मणेरी (वय 70) हे सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी माळशिरस येथून घर सोडून निघून गेले होते. त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी गळफ ास घेतलेल्या अवस्थेत नीरा नदीच्या पुलाखाली आढळून आला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवकाते यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदली आहे. मृताच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. या संदर्भात मृताच्या नातेवाईकांनी मणेरी यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त केली आहे. पुढील तपास स. पो. नि. शुभांगी ढगे या करीत आहेत.