शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात नथीचा नखरानंतर आता सुरू झाला वैभव विभूतीचा ट्रेंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 17:54 IST

सोशल मीडियावर प्रतिसाद : सोलापुरातील आबालवृद्धांचे फोटो झळकू लागले 

ठळक मुद्देवीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागीआपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात समतेचा संदेश दिला. हा संदेश देत असताना त्यांनी विभूतीचे महत्त्वही सांगितले. विभूती लावल्यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतो अन् हाच विचार कोरोनाशी दोन हात करताना बळ मिळवून देतो. हा धागा पकडून वीरशैव व्हिजनने सोशल मीडियावर  आता ‘वैभव विभूतीचे’ ट्रेंड सुरू केला असून, नथीचा नखरानंतर यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

सध्या महिलांमध्ये साडी चॅलेंज, नथीचा नखरा अनेक ट्रेंड अथवा चॅलेंज चालू आहेत. त्यामध्ये महिला त्या ट्रेंडप्रमाणे फोटो काढून अथवा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.  त्याच पद्धतीने वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या वतीने ‘वैभव विभूतीचे’ हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनातून मुक्त कर अशी प्रार्थना ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याकडे या माध्यमातून करत असल्याचे वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी सांगितले. 

वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी होत असल्याचे कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते यांनी सांगितले.

हा ट्रेंड यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते, सहकार्याध्यक्षा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, रेणुका धुमाळे, स्वीटी करजगीकर, कल्पना तोटद, रेश्मा निडगुंडी, पूजा साखरे, गायत्री गाढवे, गौरी खंडाळे, अमृता नकाते, पुष्पा कत्ते, दीपा तोटद, मंगल परशेट्टी, अरुंधती शेटे आदी परिश्रम घेत आहेत.

विभूतीने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते - विभूतीचे महत्त्व व विभूती लावण्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न वीरशैव व्हिजन महिला आघाडी करत आहे. विभूती लावणे हे भगवान शंकराच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याचा प्रकार मानला जातो. विभूतीमधील तीनही रेषा प्रतिकात्मक मानल्या जातात. पहिली रेषा अहंकाराला दूर करण्याचे प्रतीक आहे. दुसरी रेषा अज्ञानपणा दूर करण्याचे प्रतीक आहे आणि तिसरी रेषा वाईट कर्मांना दूर करण्याचे प्रतीक आहे. विभूती लावल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विभूतीमुळे शरीरातील सात चक्र नियंत्रित करण्यास मदत होते. विभूती मस्तकावर धारण केल्याने ध्यान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया