शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

सोलापुरात नथीचा नखरानंतर आता सुरू झाला वैभव विभूतीचा ट्रेंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 17:54 IST

सोशल मीडियावर प्रतिसाद : सोलापुरातील आबालवृद्धांचे फोटो झळकू लागले 

ठळक मुद्देवीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागीआपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात समतेचा संदेश दिला. हा संदेश देत असताना त्यांनी विभूतीचे महत्त्वही सांगितले. विभूती लावल्यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतो अन् हाच विचार कोरोनाशी दोन हात करताना बळ मिळवून देतो. हा धागा पकडून वीरशैव व्हिजनने सोशल मीडियावर  आता ‘वैभव विभूतीचे’ ट्रेंड सुरू केला असून, नथीचा नखरानंतर यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

सध्या महिलांमध्ये साडी चॅलेंज, नथीचा नखरा अनेक ट्रेंड अथवा चॅलेंज चालू आहेत. त्यामध्ये महिला त्या ट्रेंडप्रमाणे फोटो काढून अथवा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.  त्याच पद्धतीने वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या वतीने ‘वैभव विभूतीचे’ हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनातून मुक्त कर अशी प्रार्थना ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याकडे या माध्यमातून करत असल्याचे वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी सांगितले. 

वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी होत असल्याचे कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते यांनी सांगितले.

हा ट्रेंड यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते, सहकार्याध्यक्षा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, रेणुका धुमाळे, स्वीटी करजगीकर, कल्पना तोटद, रेश्मा निडगुंडी, पूजा साखरे, गायत्री गाढवे, गौरी खंडाळे, अमृता नकाते, पुष्पा कत्ते, दीपा तोटद, मंगल परशेट्टी, अरुंधती शेटे आदी परिश्रम घेत आहेत.

विभूतीने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते - विभूतीचे महत्त्व व विभूती लावण्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न वीरशैव व्हिजन महिला आघाडी करत आहे. विभूती लावणे हे भगवान शंकराच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याचा प्रकार मानला जातो. विभूतीमधील तीनही रेषा प्रतिकात्मक मानल्या जातात. पहिली रेषा अहंकाराला दूर करण्याचे प्रतीक आहे. दुसरी रेषा अज्ञानपणा दूर करण्याचे प्रतीक आहे आणि तिसरी रेषा वाईट कर्मांना दूर करण्याचे प्रतीक आहे. विभूती लावल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विभूतीमुळे शरीरातील सात चक्र नियंत्रित करण्यास मदत होते. विभूती मस्तकावर धारण केल्याने ध्यान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया